इम्रान हाश्मी बद्दल आमचे सतत मत बदलत गेले आहे. सुरवातीला अतिशय निर्बुद्ध अभिनय करायचा म्हणून तो आवडला नाही. नंतर काही काळ मल्लिका सोबत टेरेसवर जे केले त्याबद्दल जेलसी होती. नंतर एकाहून एक टंच मुलींसोबत त्याने सिनेमे केले आणि आम्ही जळून खाक झालो. हाहाहा
दिल तो बच्चा है जी पासून तो सेन्सिबल वाटू लागला आणि डर्टी पिक्चर पासून तर त्याच्या प्रेमातच आहे...अझहर बघायचे कारण फक्त इम्रान हाश्मी होते कारण आम्हाला क्रिकेट कळेपर्यंत (1994) सचिन तेंडुलकर नावाचे वादळ घोंघावत होते आणि बाकी सर्व तारे त्यासमोर फिके वाटत होते.
एक लहानशी चूक आयुष्यभराची पुण्याई हिरावून नेऊ शकते तसे अझहरचे झाले. न्यायालयाने त्याला दोषमुक्त केलेले आहे पण क्रिकेटवेडे भक्त लोक माफ करतील असे वाटत नाही.
सिनेमा पाहतांना त्याच्यामुळे गाजलेल्या काही मॅच आणि त्याचे षटकार आठवले... भारताने 50 षटकात 300+ रन पहिल्यांदा त्याच्याच captainship मध्ये केले. 5 बाद 305 स्कोअर होता आणि अझहर चे शतक...
1996 साली एकदा लान्स क्लुसनर ला भाई ने एका ओवर मध्ये 5 चौके मारले होते...तेही टेस्ट मॅच मध्ये...
त्याचे मॅच नंतरचे टिपिकल " या...बॉयज प्लेड वेल" हे वाक्य पण आठवले... इम्रान ने त्याच्या अजागळ चालण्याची इतकी छान नक्कल केली आहे... कॉलर मागून वर, डोक्यावर पांढरे हेल्मेट... असे वाटते हाच आपला अजझर...
सिनेमात त्याच्या दोन्ही बायका खूप छान दाखवल्या आहेत... खऱ्या आयुष्यात तशाच असतील का ते माहित नाही...
त्याला आयुष्याने आपली प्रतिमा सुधारण्याची संधी दिली आणि इम्रान ने आपले काम चोख केलेय...
आणि या मॅच फिक्सिंगच्या चिखलात राहून ही कोणाचीही ज्याच्याकडे बघण्याची हिम्मत झाली नाही त्या सचिन तेंडुलकर या माणसाबद्दल आदर दाटून आलाय.... एका interview मध्ये तो म्हणाला होता...
"लोक म्हणतात यश मिळाल्यावर मूल्य जपणे अवघड असते. मला तर ते नेहमीच सोपे वाटले. आईबाबांनी जे शिकवले आहे त्याबाहेर जायचे नाही हे पक्के होते त्यामुळे कधीच confusion झाले नाही"
काय म्हणावे या साधेपणाला.... ___/\___
दिल तो बच्चा है जी पासून तो सेन्सिबल वाटू लागला आणि डर्टी पिक्चर पासून तर त्याच्या प्रेमातच आहे...अझहर बघायचे कारण फक्त इम्रान हाश्मी होते कारण आम्हाला क्रिकेट कळेपर्यंत (1994) सचिन तेंडुलकर नावाचे वादळ घोंघावत होते आणि बाकी सर्व तारे त्यासमोर फिके वाटत होते.
एक लहानशी चूक आयुष्यभराची पुण्याई हिरावून नेऊ शकते तसे अझहरचे झाले. न्यायालयाने त्याला दोषमुक्त केलेले आहे पण क्रिकेटवेडे भक्त लोक माफ करतील असे वाटत नाही.
सिनेमा पाहतांना त्याच्यामुळे गाजलेल्या काही मॅच आणि त्याचे षटकार आठवले... भारताने 50 षटकात 300+ रन पहिल्यांदा त्याच्याच captainship मध्ये केले. 5 बाद 305 स्कोअर होता आणि अझहर चे शतक...
1996 साली एकदा लान्स क्लुसनर ला भाई ने एका ओवर मध्ये 5 चौके मारले होते...तेही टेस्ट मॅच मध्ये...
त्याचे मॅच नंतरचे टिपिकल " या...बॉयज प्लेड वेल" हे वाक्य पण आठवले... इम्रान ने त्याच्या अजागळ चालण्याची इतकी छान नक्कल केली आहे... कॉलर मागून वर, डोक्यावर पांढरे हेल्मेट... असे वाटते हाच आपला अजझर...
सिनेमात त्याच्या दोन्ही बायका खूप छान दाखवल्या आहेत... खऱ्या आयुष्यात तशाच असतील का ते माहित नाही...
त्याला आयुष्याने आपली प्रतिमा सुधारण्याची संधी दिली आणि इम्रान ने आपले काम चोख केलेय...
आणि या मॅच फिक्सिंगच्या चिखलात राहून ही कोणाचीही ज्याच्याकडे बघण्याची हिम्मत झाली नाही त्या सचिन तेंडुलकर या माणसाबद्दल आदर दाटून आलाय.... एका interview मध्ये तो म्हणाला होता...
"लोक म्हणतात यश मिळाल्यावर मूल्य जपणे अवघड असते. मला तर ते नेहमीच सोपे वाटले. आईबाबांनी जे शिकवले आहे त्याबाहेर जायचे नाही हे पक्के होते त्यामुळे कधीच confusion झाले नाही"
काय म्हणावे या साधेपणाला.... ___/\___

No comments:
Post a Comment