Sunday, 29 May 2016

तत्वज्ञान - जी.ए.कुलकर्णी

झाडावरच्या फुलाचा वास जमिनीचे सर्व थर पार करून  जमिनीखालील मुळांपर्यंत पोचला. तिकडे नव्या-जुन्या मुळांचा समुदाय सुखाने नांदत होता. जुन्या मुळांना समाधान वाटले कारण त्यांनीच जमिनीतून आयुष्य शोषून वर झाडाला पाठवले होते. आपल्या रोपट्याचे झाड झाल्याची जाणीव आयुष्याच्या संध्याकाळी त्यांना एकाच वेळी सुखावून गेली आणि आपण आता फार दिवस नसणार या भावनेने ते विषण्ण झाले..
,
एका तरुण जिज्ञासू मुळाने विचारले " पण कशावरून हा वास आपलाच आहे? कदाचित हे वेगळेच झाड असेल किंवा फुल नसून पानाचा वास असेल"
,
"आपण इतके कष्ट केले पण आपल्याला झाड बघायला मिळत नाही.. मग काय उपयोग आपल्या कष्टांचा?" इतर तरुण मुळे म्हणाली... आपण याचा शोध घ्यायलाच हवा असे त्यांचे ठरले व त्यांनी सर्व शक्ती लावून वरच्या दिशेने प्रवास चालू केला...
अंधारातून उजेडाकडे जाणार हा प्रवास सोपा नव्हता..पण सर्वांचा निश्चय पक्का होता...
,
म्हाताऱ्या मुळाने त्यांना परोपरीने सांगितले की फुलांचा सुगंध अनुभवला हे पुरेसे नाही का? फुल प्रत्यक्ष का बघायला हवे?
पण त्याचे कोणीच ऐकले नाही... आणि त्याने शेवटचे डोळे मिटले..
,
अथक प्रयत्नांनंतर बाकीची सर्व मुळे जमिनीवर आली आणि त्यांचे झाड जमिनीवर उन्मळून पडले... सूर्याच्या किरणांनी कित्येक मुळांनी प्राण सोडले.. बाकीच्यांच्या अंगाला सुरकुत्या पडल्या...
,
ज्या फुलाच्या गंधामुळे यांना ही प्रेरणा मिळाली ते फुल निस्तेज होऊन जमिनीवर पडले होते आणि त्याचा रंग सुद्धा आता ओळखू येईना...
,
तरुण मूळ म्हणाले "हेच आपले फुल का? ना याला गंध आहे ना रंग... आपला भ्रमनिरास झाला पण याने जगाचा फायदा होईल"
त्याचे हे तत्वज्ञान ऐकायला कोणीही जिवंत नव्हते आणि त्यानेही क्षणार्धात डोळे मिटले......󾌹
,

तात्पर्य : जीएंच्या इतर गोष्टींप्रमाणे याचे एकच तात्पर्य असू शकत नाही; अनंताच्या शोधात निघालेल्या माणसाने वर्तमानाकडे डोळसपणे बघायला हवे असे मला जाणवले.  काही गोष्टींची अनुभुती सुखद असली तरी त्यांच्या जास्त खोलात जास्त जाऊ नये...

मोठ्यांनी सांगितलेल्या गोष्टी नेहमीच इररेलॅव्हेंट नसतात आणि आपण आपला रॅशनल अप्रोच कधीकधी आवरता घ्यावा असेही वाटले.
,
आपण आयुष्यभर केलेल्या कष्टाचे फलस्वरूप असलेला आपला नातवंडांनी भरलेला संसार सोडून जातांना आजीआजोबांचा जीव किती अडकत असेल याची कल्पना आली.... 󾌹󾌹󾌹
.
जाणकारांनी आपले तात्पर्य (विचार) जरूर इकडे सांगा... मी नवखा असल्याने ते जाणून घ्यायला मला आवडेल....

Sunday, 22 May 2016

परफेक्ट मिसमॅच..मराठी नाटक 😊

काही गोष्टी आपल्यासाठी नसतात असे आपण स्वतःशी ठरवून ठेवलेले असते त्यामुळे आपण सहसा त्यांच्या वाट्याला जातच नाही. आमच्यासाठी संगीत आणि नाटक हा असाच विषय होता. संगीत फक्त मुलींसाठी आहे आणि मुलींबद्दल राग असल्याने त्यात आम्ही नेहमी काठावर पास व्हायचो...

तसेच "नाटक फक्त शरीफ लोकांसाठी आहे" असे वाटल्याने आम्ही नाटक पण कधी बघितले नाहीत. औरंगाबादला एकनाथ नाट्यमंदिरासमोर आमचा #KGMS ग्रुपचा कट्टा होता इतकाच आमचा नाटकांशी संबंध.

इकडे नवीनच ओळख झालेला मित्र किरण माने एका नाटकाचा मुख्य अभिनेता आहे असे कळले आणि त्याच्यासोबत आपली फेवरेट अमृता सुभाष आहे आणि या नाटकाला खूप अवॉर्ड पण मिळाले आहेत असे पहिले आणि काल दादरला शिवाजी मंदिराला नाटक पहायला गेलो.

मुख्य अभिनेता आपला 'दोस्तं' आहे आणि त्याने आपल्यासाठी पास ठेवला आहे असे तिकीट खिडकीवर सांगितले की लोक फारच रिस्पेक्टने पाहतात असा अनुभव आला... हाहा....

आधी नाटके जास्त  पाहिली नसल्याने आणि 'तुझे आहे तुजपाशी' सारख्या भयंकर आठवणी सोबत असल्याने हे नाटक आवडले नाही तर किरण ला फेस कसे करणार ही भीती वाटत होती.

नाटकाचा विषय आहे matrimony आणि आपली त्यातली गती जुन्या मित्रांना चांगलीच माहित आहे.. (संदर्भ शादी.कॉम आणि रिलेटेड पोस्ट) त्यामुळे नाटक पहिल्या मिनीटापासून पकड घेत गेले. पस्तिशीची unmarried मुलगी आणि नुकताच चाळीशीत आलेला हिरो यांचे भावविश्व या दोघांनी अगदी सुंदर समोर आणले.

आपण जगाची अजिबात पर्वा करत नाही असे सतत सांगणारे लोक आतून खूप संवेदनशील आणि केअरिंग असतात आणि बाहेरून रफ आणि गावंढळ वाटणारी व्यक्ती मनाने प्रचंड सुंदर असू शकते..... या मिसमॅच मधली जोडी अशीच आहे.... एकटेपणामुळे थोडी विक्षिप्त वागणारी गोड मुलगी आणि सातारचा रांगडा मुलगा जो आतून अगदी निर्मळ आणि लवेबल आहे.

Forced Bachelorship लादली गेलेली मुले आणि काही मुली जवळून पाहिल्याने हे दोघे कधी अभिनेते वाटलेच नाहीत..असे वाटले अरे हा तर आपला हा आहे आणि ती तर अशीच बोलते, आपल्या हिच्यासारखी...

परस्परविरुद्ध स्वभाव असणारे दोन लोक एकमेकांच्या प्रेमात पडू शकतात आणि बाकी कसलाही विचार न करता ते एकत्र आल्यास आयुष्य किती सुंदर आणि फुलफिलिंग होऊ शकते हे आम्हाला चांगलेच माहित आहे. यातले दोघेही असेच असतात... पण यांच्या शास्त्रीय संगीतासारख्या समान आवडीनिवडी यांना एकत्र बांधून ठेवतात.

इतरांना काहीच त्रास होणार नाही असे काम फक्त साधूसंन्याशी लोक करतात असे अभिनेता म्हणतो आणि काही वेळाने त्याच्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांबद्दल आदर व्यक्त करतो... या दोन प्रसंगात एकाच माणसाची दोन भिन्न रूपे समोर येतात.

इंग्लिश गाणे म्हणणारी, बुलेट चालवणारी मॉडर्न मुलगी जेव्हा तिच्या पुरुषांबद्दल द्वेष बाळगण्याचे कारण सांगते तेव्हा आपणही तिच्यासोबत तिच्या कोल्हापूरच्या वाड्यात जातो..आणि तिच्या बाबांसोबतच तिच्या गल्लीतल्या टारगट मुलांचा द्वेष करू लागतो...
शेवटी हे एकत्र येतील असे वाटत असतांनाच नको ती फिलॉसॉफी ऐकून त्या मुलीचा आपल्याला राग सुद्धा येतो...

आपली इनवोलव्हमेंट सतत चढती ठेवण्यात हे नाटक यशस्वी होते. पहिला अंक संपल्यावरच किरणदादाला भेटायला मेकअप रूम मध्ये गेलो. जावे की नाही असे ही म्हणत होती पण म्हटलं चल गं.. आपला माणूस आहे...
आणि भेटल्यावर त्याच्या गळ्यातच पडलो... मनापासून नाटक आवडल्याने त्याला फेस करायची काळजी आता कुठेच नव्हती...

मागच्या वर्षी आमचा किल्ला बद्दल review वाचून अमृता सुभाष आमच्या वॉल वरून नाराज होऊन गेली होती..त्यामुळे तिला भेटायला भीती वाटत होती पण तसा काही संदर्भ न आल्याने प्रसंग छान फोटोसहित साजरा झाला

किरण भाऊ - जिंकलस बाबा... सल्लूबेबी आणि हिंदी सिनेमाचा फॅन आता मराठी नाटकसुद्धा आवडीने बघू लागला तर ही प्रगती फक्त तुझ्यामुळे आहे...

आणि सिनेमा पेक्षा थेटर का बेस्ट आहे ते काल कळले.... थेट प्रेक्षकांसमोर डिलिव्हर करण्यात जो थ्रिल आहे तो रिटेक वाल्या रिळांमध्ये कसा येईल? आणि आपला बेस्ट परफॉर्मन्स त्या दोन तासांत देणे तेही कुठेच न चुकता... मान गये भाई... ही नशा असल्यावर तुला दारूची काय गरज रे???

तुला भविष्यासाठी खूप खूप म्हणजे खूप जास्त शुभेच्छा...तुला अजून पुरस्कार मिळोत आणि आम्हाला तुला  भेटायला लंबी कतार मध्ये थांबावे लागो ही शुभेच्छा....

आणि अमृता ताई - तुझे एक उलट एक सुलट पासूनच तू माझी आवडती लेखिका झालीस... आता आवडती अभिनेत्री सुद्धा आहेस #परफेक्टमिसमॅच... #मराठी #नाटक

Friday, 20 May 2016

सचिन आणि विनोद..

अझहर सिनेमा पाहतांना विनोद कांबळी ने सचिनबद्दल सांगितलेला एक किस्सा आठवला...सचिनला लताबाईंकडून बक्षीस मिळणार होते आणि तिकडे विनोद सुद्धा उपस्थित होता...

1987-88 साली ते शाळेच्या टिमकडून खेळत होते... विनोद स्ट्रायकर एन्ड ला आणि सचिन नॉन स्ट्रायकर एन्ड ला...जानेवारी महिन्याचे दिवस असल्याने आकाशात पतंग उडत होते. असाच एक पतंग कटून उडत उडत ग्राउंडवर आला आणि विनोद ने बॅट सोडून पळत पळत जाऊन तो पतंग पकडला... 10-15 मिनिटे त्या मुलांसोबत उडवला आणि क्रिजवर परत आला.

त्याचे खेळामुळे वजन इतके होते की कोणी त्याला काही बोलण्याचा प्रश्नच नव्हता... ही मधली 15-20 मिनिटे सचिन पॅड आणि हेल्मेट न काढता नॉन स्ट्रायकर एन्ड ला बॅट टेकवून उभा होता..त्याने विनोद ला एक चकार शब्दाने टोकले नाही... आपला खेळ चालू केला...

यावर विनोद त्या कार्यक्रमात म्हणाला की सचिन माझ्याच वयाचा होता, त्याला पतंग उडवायला आवडत सुद्धा होते पण त्याने खेळाला महत्व दिले... असे अनेक मोहाचे प्रसंग आले पण सचिनचे प्रेफेरेन्सेस क्लिअर होते. म्हणून आज तो तिथे आहे आणि मी इथे...

सगळ्या जगसमोर आपला पराभव मान्य करणारा विनोद कांबळी जितका विलक्षण मनाला भिडला तितकाच सचिन बद्दल आदर दाटून आला...

टॅलेंट विनोदकडे काकणभर जास्तच होते पण घरातल्या लोकांचे मार्गदर्शन त्याला लाभले नाही आणि वयाच्या फक्त  23व्या वर्षी कर्टली अँब्रोजच्या एका बाऊंसर चेंडूने कसोटी क्रिकेटमधून त्याला बाहेर फेकले ते कायमचेच....

बेस्ट फ्रेंड्स ते लाईफ पार्टनर....

कॉलेजवयीन मुला-मुलीच्या मैत्रीत मुलगा नेहमी दात्याच्या भूमिकेत असतो. तो आपल्या मैत्रिणीची काळजी घेतो, आपले काम सोडून तिला हवे नको ते पाहतो, तिचे मुड स्विंग सहन करतो, अशक्य पाणचट जोक वर हसतो, शॉपिंग ला सोबत जाऊन बॅगा सांभाळतो, ते सोबत असतांना मोस्टली आपणच जास्त खर्च करतो, तिच्या घरच्यांशी नेहमी बोलून त्यांना आश्वस्त करतो...

मोस्ट ऑफ द केसेस मध्ये त्याच्या हातात काहीच येत नाही. मुलगी स्वप्नातला रांगडा राजकुमार निवडते आणि सगळ्यात आधी त्यालाच सांगते... कोणी भेटले नाही की त्याच्यासोबतच वेळ घालवते आणि काही दिवसांनी संदर्भ बदलले की त्याला विसरून पण जाते.

अहो मुलं काय साधू सन्यासी नाहीत..उगीच कोणाशी चांगले वागायला... त्यांना मुलगी हवी असते म्हणून हे सगळे ते सहन करत असतात... मग विमान जमिनीवर आले की तिच्या *** ** असे म्हणणे असतेच... त्या वेळेस मित्रच लागतो... कोणासोबत राडा झाला तर मित्रच कामाला येतो... खिशात पैसे कमी असतील तर मैत्रिण देते पैसे की मित्र?? आणि मागता कोणाला??? करिअर च्या काळजीत कोणाचा आधार वाटतो?? मित्राचाच ना? जगात  कुठेही असले तरी "कारे भेंचोद विसरला का??" असे आपलेपणाने कोण म्हणते?? तुमची ती मैत्रीण का?? हाहाहा

हे सगळे आठवण्याचे कारण सचिन परांजपे यांची पोस्ट... मला तर वाटते 15 ते 25 या वयोगटातील मुलांनी ज्या मुलीशी लग्न करावे वाटते तिच्याशी मैत्री (बेस्ट फ्रेंड / pal / बेस्ट बडी वगैरे) अजिबात करू नये... थेट विचारावे... लग्न करणार असशील किंवा अजून काही तर आपण बोलू नाहीतर मला मित्र खूप आहेत... लोकांचे भांडे घासून आपले आयुष्य उजळणार नाही....हाहाहा

मलिक भाईचा डायलॉग लक्षात ठेवा -- "कोई कुछ भी कहे..दुनिया में हर काम फायदे के लिये होता है......"

टीप : असहमत असाल तर वैधानिक पद्धतीने सांगा... आमचे संस्कार काढले तर आम्हाला तुमच्या जवळच्या नातेवाईकांची आठवण येऊ शकते ;) हाहाहा

अझहर - Movie Review

इम्रान हाश्मी बद्दल आमचे सतत मत बदलत गेले आहे. सुरवातीला अतिशय निर्बुद्ध अभिनय करायचा म्हणून तो आवडला नाही. नंतर काही काळ मल्लिका सोबत टेरेसवर जे केले त्याबद्दल जेलसी होती. नंतर एकाहून एक टंच मुलींसोबत त्याने सिनेमे केले आणि आम्ही जळून खाक झालो. हाहाहा

दिल तो बच्चा है जी पासून तो सेन्सिबल वाटू लागला आणि डर्टी पिक्चर पासून तर त्याच्या प्रेमातच आहे...अझहर बघायचे कारण फक्त इम्रान हाश्मी होते कारण आम्हाला क्रिकेट कळेपर्यंत (1994) सचिन तेंडुलकर नावाचे वादळ घोंघावत होते आणि बाकी सर्व तारे त्यासमोर फिके वाटत होते.


एक लहानशी चूक आयुष्यभराची पुण्याई हिरावून नेऊ शकते तसे अझहरचे झाले. न्यायालयाने त्याला दोषमुक्त केलेले आहे पण क्रिकेटवेडे भक्त लोक माफ करतील असे वाटत नाही.

सिनेमा पाहतांना त्याच्यामुळे गाजलेल्या काही मॅच आणि त्याचे षटकार आठवले... भारताने 50 षटकात 300+ रन पहिल्यांदा त्याच्याच captainship मध्ये केले. 5 बाद 305 स्कोअर होता आणि अझहर चे शतक...
1996 साली एकदा लान्स क्लुसनर ला भाई ने एका ओवर मध्ये 5 चौके मारले होते...तेही टेस्ट मॅच मध्ये...

त्याचे मॅच नंतरचे टिपिकल " या...बॉयज प्लेड वेल" हे वाक्य पण आठवले... इम्रान ने त्याच्या अजागळ चालण्याची इतकी छान नक्कल केली आहे... कॉलर मागून वर, डोक्यावर पांढरे हेल्मेट... असे वाटते हाच आपला अजझर...

सिनेमात त्याच्या दोन्ही बायका खूप छान दाखवल्या आहेत... खऱ्या आयुष्यात तशाच असतील का ते माहित नाही...

त्याला आयुष्याने आपली प्रतिमा सुधारण्याची संधी दिली आणि इम्रान ने आपले काम चोख केलेय...

आणि या मॅच फिक्सिंगच्या चिखलात राहून ही कोणाचीही ज्याच्याकडे बघण्याची हिम्मत झाली नाही त्या सचिन तेंडुलकर या माणसाबद्दल आदर दाटून आलाय.... एका interview मध्ये तो म्हणाला होता...

"लोक म्हणतात यश मिळाल्यावर मूल्य जपणे अवघड असते. मला तर ते नेहमीच सोपे वाटले. आईबाबांनी जे शिकवले आहे त्याबाहेर जायचे नाही हे पक्के होते त्यामुळे कधीच confusion झाले नाही"

काय म्हणावे या साधेपणाला.... ___/\___

Sunday, 8 May 2016

आभारप्रदर्शन 2016

फेसबुक म्हणजे एक सुंदर दिसणारी चेटकीण आहे असे कधीकधी वाटते.. तुम्ही तिच्या इतके प्रेमात असता की ती आज ना उद्या आपला घास घेईल हे माहित असूनही तिची ओढ कमी होत नाही... यावरून एक vampires चा इंग्लिश सिनेमा आठवला... नाव लक्षात नाही पण त्यातली हिरोईन फारच गोडी आहे... 󾌧󾌧󾌬

तर मुद्दा हा की माझ्या वाढदिवसाच्या दिवशी इकडे जे पोस्टर बनवले गेले आणि पोस्ट लिहिल्या गेल्या ते पाहून परत या हडळीच्या प्रेमात पडलो आहे.हा हा हा

मार्केटिंग मध्ये नॅचरल मार्केट नावाची संकल्पना आहे ज्या अंतर्गत आपले नातेवाईक आणि शाळा-कॉलेजमधले मित्र, कलिग्स येतात.. ज्यांना आपण सर्वात आधी कॉन्टॅक्ट करू शकतो...

या वर्तुळाबाहेरचे लोक जे कधीच आपल्याला भेटले नाहीत त्यांच्याशी फक्त पोस्ट मुळे मैत्र व्हावे... त्यांनी आपल्याला कठीण प्रसंगी आधार द्यावा आणि आपण त्यांच्यासोबत खिदळावे किंवा गंभीर व्हावे यासारखे सुख कशात नाही...

मी नेहमी म्हणतो देवाने आपल्याला या बाबतीत लौ श्रीमंत बनवले आहे... भौतिक अर्थाने तर होऊच पण असे श्रीमंत असण्याचा जास्त आनंद आहे.. 󾌵

माझे गळके, भगदाड पडलेले लोखंडी टमरेल लोकांना अजून लक्षात आहे याचाही आनंद झाला... हा हा हा... त्याची आजकाल गरज पडत नाही तो भाग निराळा...

सर्वांना मनापासून आभार आणि @vaishali patil - तुझे गिफ्ट सर्वात जास्त आवडले... 󾌵󾌵

संदर्भ : हडळ आणि कवटी मला खूप गोड गोष्टी वाटतात... टॉम अँड जेरी सारख्या... त्यामुळे त्या शब्दांच्या लौकिकार्थाने त्यांच्याकडे बघू नये...

आणि टमरेल मी दांभिक लोकांच्या डोक्यात हाणायला बनवले होते... पूर्वी (जुन्या अकाउंटवर) खूप वापर व्हायचा... आजकाल पडून आहे... हाहाहा

मदर्स डे...

माझ्या आईबद्दल काय लिहावे हा नेहमी प्रश्नच पडतो.. कारण आपल्या भावना सार्वजनिक करणे तिला अजिबात आवडत नाही आणि इतरांसारखा मी आईबद्दल निष्पाप पण नाही...
भूतकाळात तिच्याबाबतीत भरपूर चुका आणि दुर्लक्ष झाल्याने मनात गिल्ट आहे त्यामुळे प्रथा म्हणून खोटे गोडवे गाणे काही मनाला पटत नाही.. बाबांबद्दल absolute आदर होता आणि आहे पण तसे आईच्या बाबत नसल्याने घोळ होतो...

बायकोला किंवा आजकाल इन जनरल इतरांना माझ्यात ज्या गोष्टी आवडतात त्या मात्र बहुतांश आईकडून आलेल्या आहेत..

नशिबाने बायको (तेव्हाची मैत्रीण) वेगळ्या गावाला असल्याने तिला फक्त माझे विचार माहित होते... बाहेरच्या गोष्टी कधीच दिसल्या नाहीत...नाहीतर आमचे अरेंज मॅरेज नक्की होते.. हाहा

मनासारखी बायको मिळाली हे आईचे माझ्या आयुष्यातले छोटेसे (!!) कॉंट्रिब्युशन....☺

आणि त्या बायकोने मनासारखे काम निवडू दिले हे तिचे त्याहून छोटे (!!!) कॉंट्रिब्युशन...

फेसबुकवरचे एस्टॅब्लिश्ड आणि निर्वासित....


करिअर मध्ये स्टेबीलिटी असते तशी फेसबुकवर लिहिण्यात पण आहे असे वाटते. सुरवातीला तुम्ही लिहू लागलात की लोक थोडे आश्चर्य व्यक्त करतात. काही कौतुक करतात आणि काही लांबलचक "हुँ" करतात..

मग हळूहळू 2 गट पडू लागतात... तुमचे वेलविशर आणि टपून बसलेले सायलेंट फॉलोअर.. सायलेंट वाल्यांना वाटते की हा कोण लागून गेलाय हे लिहायला? भैनचोद पत्रकार आहे की नेता? की सिनेमा क्रिटिक... याच्या *** ** आपल्या सोबत असतांना तर वट्ट औकातीत राहत होता..आता का इतका उचकतोय...

मग तुम्ही प्रसिद्धीसाठी व्यक्त होता असे काही म्हणतात.. काहींना वाटते तुम्ही लोकांना इम्प्रेस करायला बघताय.. इथल्या लाइक शेअर कमेंटच्या गणितात तुम्हीपण थोडेफार गुरफटत जाता... मग हजारो लोक जोडले गेले तरी चाळणी लावल्यावर मोजून दहा पाच चांगले हाताला येतात.. बाकीचे आलटून पालटून दंश करण्यात आणि पापी घेण्यात दंग असतात..

मग आणखी काही काळ जातो आणि तुम्ही नवीन रूप घेता... यावेळी जास्त कोणाला आत घेत नाही..जे चांगले आहेत त्यांच्यासोबत वेळ घालवू लागता...  एव्हाना तुम्हाला होणारा विरोधसुद्धा फारच कमी झालेला असतो... तुम्ही किंवा लोक कोणीतरी एक कंटाळलेले असते...

इथून पुढे.... काय होईल ते माहित नाही... ते जोतो ठरवतो... मंदार काळेंसारखे काही hibernate मोड वर जातात तर काही उदय जोशी/मंडलीक यांच्यासारखे स्वच्छ प्रतिमेत टिकून राहतात... (तेंडुलकर सारखे) हाहाहा

काही लोक कंपू बनवून त्याला वाढवत असतात आणि आपल्या वाट्याला आलेले विष जगाला दाखवत असतात... हे करत असतांना काही सकारात्मक दृष्टिकोन अभावानेच आढळतो...

बाकीचे आमच्यासारखे ना इकडे ना तिकडे टाईप लोक काय करतात ते माहित नाही... कधी कोणाचा उठतो आणि अकाउंट बंद करून पळून जातो आणि परत सुद्धा येतो.., कोणी पुस्तक वाचू लागतो, कोणी नवीन नोकरीच्या तयारीत लागतो तर कोणी फोटो काढत फिरतो...

"इथे प्रत्येक जण फेसबुकच्या प्रेमात आणि डोळे कीपॅड वर आहेत...
पण FB addiction वर बोलणे हा प्रत्येकाचा छंद आहे..."

(मूळ चारोळी - चंद्रशेखर गोखलेंच्या मी।माझा मधली आहे...
इकडे प्रत्येक जण आपल्या घरात
दार लावलेले आहे
पण एकोप्यावर बोलणे हा
प्रत्येकाचा छंद आहे)

चुकली आहे माहितीय... परत नका सांगू... 󾌵हाहाहा

सैराट बद्दल 😊

सैराट पाहतांना आमच्या FY मधल्या 2 गोष्टी आठवल्या.. वर्ष 2002...

किस्सा नंबर 1 : आमची एक गोड क्लासमेट होती जिचे सो कॉल्ड मागास प्रवर्गामधल्या पण श्रीमंत मुलाशी प्रकरण होते. त्याचे भाऊजी फार मोठ्या पोस्ट वर असल्याने हा वट मध्ये असायचा... मराठवाड्यात एका दिवंगत नेत्याच्या कृपेने त्यांचे असोसिएशन फार स्ट्रॉंग आहे...

मुलीच्या घरी हे कळल्यावर त्या मुलाने मुलीच्या वडिलांची कॉलर पकडली की लग्न करून दे वगैरे..अर्थात हे ऐकीव आहे.

नंतर मुलीच्या बापाने मुलीला फुल मारले आणि ती कॉलेजला आली ते थेट 3 दिवसांनी... चेहऱ्यावरच्या खपल्या झाकत आपला TC ती घेऊन गेली आणि नंतर पुण्याला गेली असे कळले आणि त्या मुलाने पण नंतर स्वजातीत लग्न केले..
जे झाले ते दोघांसाठी योग्य झाले असे सार्वमत होते..

गोष्ट दुसरी : आम्हाला मराठीत एक धडा होता... एका गावात एक पुढारी असतो. त्याच्या मुलीचे वर्गातल्या एका दलित नेत्यावर पिरेम बसते.. हा मुलगा म्हणजे जणू धगधगता ज्वालामुखी...त्याचे विचार आणि वक्तृत्व पंचक्रोशीत गाजलेले असते... त्याचा जनसंपर्क सुद्धा दांडगा असतो...

पोरीच्या वडिलांना हे प्रकरण समजते...ते कोणतीही खळखळ न करता पोरीचे लग्न लावून देतात.. दलिताशी पोरीचं लग्न लावून दिले म्हणून त्यांना राजकीय लाभ मिळतो आणि ते मंत्री होतात...

इकडे वाऱ्यावर हुकूमत असणारा त्यांचा जावई मात्र एका समारंभात सासर्यांच्या बंगल्यासमोर उभा राहून आलेल्या पाहुण्यांचे हात जोडून आणि वाकून स्वागत करत असतो.... आणि त्याचे सासरे त्याच्याकडे हसून पाहत असतात...

या गोष्टीवर एक सिनेमा सुद्धा आहे..ज्यात अविनाश नारकर दलित नेत्याच्या भूमिकेत आहे...

तात्पर्य : तुमि घेशाल ते...

Movie Review : सैराट

सैराट बद्दल खूप reviews वाचल्याने स्टोरीबद्दलच्या अपेक्षा जमिनीवर आल्या होत्या त्यामुळे प्रत्येक फ्रेम मध्ये काय मेसेज आहे हे आम्ही शोधत होतो...किंवा प्रतिष्ठित लोक ज्याला अंडरकरंट्स म्हणतात ते शोधत होतो.. मुलगी पळून गेल्याने पाटलाचे आमदार व्हायचे स्वप्न भंगते हा one of the अंडर करंट असावा असे वाटते...


तालुक्याच्या युवा नेतृत्वाच्या वाढदिवसाची पार्टी अरेंज करायला शाळेच्या "स्टॉफ" कडून खंडणी (म्हणजेच वर्गणी) गोळा करतांना त्या प्रसंगाच्या बॅकग्राउंडला शिवाजी महाराजांचा पुतळा आम्ही पहिला...

"पाटलाला तहान नाही लागत होय??" हा प्रश्न आम्ही नोट केला... बाकी पाटलाची शान आणि कॉलेजची मस्ती अगदीच पठडीमधली असली तरी टाईमपास/दुनियादारी सारख्या भिकार सिनेमांपेक्षा भरपूर सेन्सिबल वाटते..

शेवटचे 15 मिनिट सिनेमा अपेक्षित वळण घेतो... मात्र नागराज मंजुळेंच्या जब्याने मारलेला दगड जितका घायाळ करून गेला तितकी त्या बालकाची पावले अस्वस्थ करत नाहीत... असे दुःखाने म्हणावे वाटते..

क्रिकेट मध्ये धोनी आणि सिनेमा मेकिंग मध्ये नागराज मंजुळे यांनी सवर्णांची मक्तेदारी संपवली (निदान कमी केली) याचा आम्हाला आनंद आहे आणि मराठी सिनेमाला रात्री 10च्या शो ला तुडुंब भरलेले थेटर पाहून फार अभिमान वाटला...

बाकी ज्यांनी QSQT, NH10, LSD (लव सेक्स धोका) सारखे सिनेमे पाहिले आहेत... त्यांना फार धक्का बसावा असावं यात काहीच नाही...फक्त या सगळ्यांचे थोडे सेन्सिबल मिश्रण बघायला मिळेल.. आणि काही लोक म्हणाले तसे तरुण पिढी बिघडेल असे तर अजिबातच काही नाही... उलट तरुणांना हा सिनेमा पाहून डोळस व्हायला हरकत नाही..

#जब्या- You are still closest to my heart...

#Nagraj_Manjule - Best wishes for 100 Crores Club... #सैराट

सूड...

जीएंची "सूड" नावाची गोष्ट वाचून आमची अकरावी मधली एक क्लासमेट आठवली... सुरवातीचे काही महीने मी पहिल्या बेंचवर बसत असे आणि ती मुलींच्या रो मध्ये पहिल्या बेंचवर असायची...

सर मध्यभागी उभे राहून शिकवत असल्याने मी डावीकडे वळून पाहत असे आणि वर्गाच्या  दुसऱ्या टोकाला असल्याने ती उजवीकडे बघत असे...आमची बरेचदा नजरानजर व्हायची आणि त्या वयानुसार तिच्या मनात कदाचित माझ्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर तयार झाला असेल असे वाटायचे...पण मला ती अजिबात आवडत नसे...कारण ती दिसायला कुरूप होती...खरं तर कोणाला कुरूप म्हणतांना आतून तुटल्यासारखं होतं पण तेव्हा विचार हेच किंवा याहून वाईट होते...

ती सतत पाहते हे मित्रांनी ओळखले आणि चिडवणे चालू केले आणि मग मात्र मी तिचा द्वेष करायला लागलो..तिच्याबद्दल वाईटसाईट बोलायला लागलो.. आमचा कंपू influential असल्याने माझ्या हेटाळणीची इन्टेन्सिटी तीव्र झाली होती..

तिने काही दिवस हे सहन केले आणि नंतर जागा बदलली.. नंतर कधीच माझ्याकडे वळून पहिले नाही.. आधी मी सुटकेचा निश्वास टाकला आणि नंतर मात्र बराच काळ इतर मित्रांशी तिचे नाव जोडून निर्लज्जासारखा तिची मजा उडवतच होतो...तिला हे कळत होते आणि तरीही ती शांत असायची..मुकाट सहन करायची...

तिने मला एकदाही खडसावून विचारले असते तर मी शांत बसलो असतो पण तिने हे केले नाही आणि माझा माज वाढतच गेला... पुढे फिजिक्स-1 चा पेपर दिला आणि सगळी नशा एका झटक्यात उतरली...नंतर पुढची 10-12 वर्षे आपणच बनवलेले खड्डे बुजवणे चालू होते..अनेकांना अपेक्षित नसतांनाही माफ करा म्हणालो काही परत आले आणि काही नेहमीसाठी सोडून गेले..

आता आपण जुने हिशोब संपवले असे वाटत असतांना आज ही गोष्ट वाचली आणि ती आठवली... तिला पूर्णच विसरलो होतो...󾌹

बाई गं.. आता 15 वर्ष झाले या गोष्टीला...तुला आता परत कधीच भेटेल असे वाटत नाही... पण मी तुझ्या लक्षात असेल तर त्या नक्कीच चांगल्या आठवणी नसतील..
I am really sorry for everything... vibes वर माझा विश्वास आहे त्या नक्की तुझ्यापर्यंत पोचतील... तू जशी आहेस तशी खूप छान आहेस...

तुला आयुष्यात जे हवे ते मिळो ही सदिच्छा.. 󾌹