झाडावरच्या फुलाचा वास जमिनीचे सर्व थर पार करून जमिनीखालील मुळांपर्यंत पोचला. तिकडे नव्या-जुन्या मुळांचा समुदाय सुखाने नांदत होता. जुन्या मुळांना समाधान वाटले कारण त्यांनीच जमिनीतून आयुष्य शोषून वर झाडाला पाठवले होते. आपल्या रोपट्याचे झाड झाल्याची जाणीव आयुष्याच्या संध्याकाळी त्यांना एकाच वेळी सुखावून गेली आणि आपण आता फार दिवस नसणार या भावनेने ते विषण्ण झाले..
,
एका तरुण जिज्ञासू मुळाने विचारले " पण कशावरून हा वास आपलाच आहे? कदाचित हे वेगळेच झाड असेल किंवा फुल नसून पानाचा वास असेल"
,
"आपण इतके कष्ट केले पण आपल्याला झाड बघायला मिळत नाही.. मग काय उपयोग आपल्या कष्टांचा?" इतर तरुण मुळे म्हणाली... आपण याचा शोध घ्यायलाच हवा असे त्यांचे ठरले व त्यांनी सर्व शक्ती लावून वरच्या दिशेने प्रवास चालू केला...
अंधारातून उजेडाकडे जाणार हा प्रवास सोपा नव्हता..पण सर्वांचा निश्चय पक्का होता...
,
म्हाताऱ्या मुळाने त्यांना परोपरीने सांगितले की फुलांचा सुगंध अनुभवला हे पुरेसे नाही का? फुल प्रत्यक्ष का बघायला हवे?
पण त्याचे कोणीच ऐकले नाही... आणि त्याने शेवटचे डोळे मिटले..
,
अथक प्रयत्नांनंतर बाकीची सर्व मुळे जमिनीवर आली आणि त्यांचे झाड जमिनीवर उन्मळून पडले... सूर्याच्या किरणांनी कित्येक मुळांनी प्राण सोडले.. बाकीच्यांच्या अंगाला सुरकुत्या पडल्या...
,
ज्या फुलाच्या गंधामुळे यांना ही प्रेरणा मिळाली ते फुल निस्तेज होऊन जमिनीवर पडले होते आणि त्याचा रंग सुद्धा आता ओळखू येईना...
,
तरुण मूळ म्हणाले "हेच आपले फुल का? ना याला गंध आहे ना रंग... आपला भ्रमनिरास झाला पण याने जगाचा फायदा होईल"
त्याचे हे तत्वज्ञान ऐकायला कोणीही जिवंत नव्हते आणि त्यानेही क्षणार्धात डोळे मिटले......
,
तात्पर्य : जीएंच्या इतर गोष्टींप्रमाणे याचे एकच तात्पर्य असू शकत नाही; अनंताच्या शोधात निघालेल्या माणसाने वर्तमानाकडे डोळसपणे बघायला हवे असे मला जाणवले. काही गोष्टींची अनुभुती सुखद असली तरी त्यांच्या जास्त खोलात जास्त जाऊ नये...
मोठ्यांनी सांगितलेल्या गोष्टी नेहमीच इररेलॅव्हेंट नसतात आणि आपण आपला रॅशनल अप्रोच कधीकधी आवरता घ्यावा असेही वाटले.
,
आपण आयुष्यभर केलेल्या कष्टाचे फलस्वरूप असलेला आपला नातवंडांनी भरलेला संसार सोडून जातांना आजीआजोबांचा जीव किती अडकत असेल याची कल्पना आली....
.
जाणकारांनी आपले तात्पर्य (विचार) जरूर इकडे सांगा... मी नवखा असल्याने ते जाणून घ्यायला मला आवडेल....
,
एका तरुण जिज्ञासू मुळाने विचारले " पण कशावरून हा वास आपलाच आहे? कदाचित हे वेगळेच झाड असेल किंवा फुल नसून पानाचा वास असेल"
,
"आपण इतके कष्ट केले पण आपल्याला झाड बघायला मिळत नाही.. मग काय उपयोग आपल्या कष्टांचा?" इतर तरुण मुळे म्हणाली... आपण याचा शोध घ्यायलाच हवा असे त्यांचे ठरले व त्यांनी सर्व शक्ती लावून वरच्या दिशेने प्रवास चालू केला...
अंधारातून उजेडाकडे जाणार हा प्रवास सोपा नव्हता..पण सर्वांचा निश्चय पक्का होता...
,
म्हाताऱ्या मुळाने त्यांना परोपरीने सांगितले की फुलांचा सुगंध अनुभवला हे पुरेसे नाही का? फुल प्रत्यक्ष का बघायला हवे?
पण त्याचे कोणीच ऐकले नाही... आणि त्याने शेवटचे डोळे मिटले..
,
अथक प्रयत्नांनंतर बाकीची सर्व मुळे जमिनीवर आली आणि त्यांचे झाड जमिनीवर उन्मळून पडले... सूर्याच्या किरणांनी कित्येक मुळांनी प्राण सोडले.. बाकीच्यांच्या अंगाला सुरकुत्या पडल्या...
,
ज्या फुलाच्या गंधामुळे यांना ही प्रेरणा मिळाली ते फुल निस्तेज होऊन जमिनीवर पडले होते आणि त्याचा रंग सुद्धा आता ओळखू येईना...
,
तरुण मूळ म्हणाले "हेच आपले फुल का? ना याला गंध आहे ना रंग... आपला भ्रमनिरास झाला पण याने जगाचा फायदा होईल"
त्याचे हे तत्वज्ञान ऐकायला कोणीही जिवंत नव्हते आणि त्यानेही क्षणार्धात डोळे मिटले......
,
तात्पर्य : जीएंच्या इतर गोष्टींप्रमाणे याचे एकच तात्पर्य असू शकत नाही; अनंताच्या शोधात निघालेल्या माणसाने वर्तमानाकडे डोळसपणे बघायला हवे असे मला जाणवले. काही गोष्टींची अनुभुती सुखद असली तरी त्यांच्या जास्त खोलात जास्त जाऊ नये...
मोठ्यांनी सांगितलेल्या गोष्टी नेहमीच इररेलॅव्हेंट नसतात आणि आपण आपला रॅशनल अप्रोच कधीकधी आवरता घ्यावा असेही वाटले.
,
आपण आयुष्यभर केलेल्या कष्टाचे फलस्वरूप असलेला आपला नातवंडांनी भरलेला संसार सोडून जातांना आजीआजोबांचा जीव किती अडकत असेल याची कल्पना आली....
.
जाणकारांनी आपले तात्पर्य (विचार) जरूर इकडे सांगा... मी नवखा असल्याने ते जाणून घ्यायला मला आवडेल....
