निल बटे सन्नाटा सिनेमा आपल्याला स्वप्न पहायला आणि ते पूर्ण करण्यासाठी जीवतोड मेहनत करायला शिकवतो. एका प्रसंगात एक कामवाली बाई जेव्हा चपराशाची नोकरी चांगली नाही असे म्हणते तेव्हा तिचे वेगळेपण आपल्याला जाणवते.
स्वतः मोठे होणे दूर पण मोठे स्वप्नं बघायचीसुद्धा तुझी लायकी नाही असे सगळे जग ओरडून सांगत असतांना ते स्वप्न जिवंत ठेवणे किती अवघड असते हे ज्याने अनुभवले त्यालाच समजू शकेल..
यातली आई ते स्वप्न जगवते आणि त्यासाठी खस्ता खाऊन ते पूर्ण सुद्धा करते. हा सिनेमा पाहतांना अनेक गोष्टी भूतकाळात घेऊन गेल्या...
सेल्स प्रोफाइल मधल्या माणसाने incentives च्या बाहेर जास्त विचार करू नये असे आमचा बॉस म्हणायचा.. रिस्पेक्ट वगैरे हवा असेल तर इकडे कशाला आलात असेही ते म्हणायचे... तुमचा तो माज आणि आमचा तो अभिमान अशा वातावरणात कोणाच्या सेल्फ रिस्पेक्टच्या चिंधड्या उडाल्या तरी जगाला त्याचे सोयरसुतक नसते...
सिनेमा पाहतांना आमच्या घरी काम करणाऱ्या सगळ्या कामवाल्या बायका आठवल्या.. त्यांची आमच्या वयाची मुले आठवली, ज्यांनी लहानपणी आमच्यासोबत धिंगाणा केला पण दहावीनंतर शाळा सोडली ती कायमची...
आमचा शांत आणि सुस्वभावी वॉचमन दिनेश आठवला जो रात्री शाळेत जात असे.. माझ्यासोबत दहावीला होता आता कुठे असेल तो???
माझ्यासोबत डेटा एन्ट्रीचे डेली वेजेसवर काम करणारा मित्र विलास आठवला... शेवटचा भेटला तेव्हा तो एका ट्रॅव्हल एजन्सी मध्ये कामाला होता आणि मी मुंबईला स्वप्न गाठोड्यात बांधून घेऊन निघालो होतो..त्याने मला ओळख दिली नाही...आणि मलाही अवघडल्यासारखे वाटले...
माझे आयुष्य बदलले पण तो कुठे असेल????
स्वरा भास्कर ला ठिकठिकाणी काम करतांना पाहून आमचे बाबा आठवले ज्यांनी ढोरासारखी मेहनत करून आम्हाला मिडल क्लास मध्ये आणले... आईची कळकळ आणि आमची बेफिकीर वृत्ती सुद्धा आठवली...
स्वरा भास्कर च्या मुलीचे वर्तन पाहून आम्ही घेतलेले लोकांचे तळतळाट आठवले... आपल्याला सोडून गेलेली माणसे यशस्वी आयुष्य जगत असतांना 'आपण त्यांच्या लायक नाही म्हणून ते गेले' हा भाव आठवला...
आणि जे जे आपल्याला नाकारले गेले ते ते सगळे परत मिळवायचे ही जिद्द सुद्धा आठवली...
सिनेमा संपून 1 तास झाला........पण अजूनही गळ्याशी दुखत आहे... पुरुषाने रडू नये म्हणतात.....
असो. सिनेमा नक्की पहा आणि कसा वाटला तेही कळवा....
स्वतः मोठे होणे दूर पण मोठे स्वप्नं बघायचीसुद्धा तुझी लायकी नाही असे सगळे जग ओरडून सांगत असतांना ते स्वप्न जिवंत ठेवणे किती अवघड असते हे ज्याने अनुभवले त्यालाच समजू शकेल..
यातली आई ते स्वप्न जगवते आणि त्यासाठी खस्ता खाऊन ते पूर्ण सुद्धा करते. हा सिनेमा पाहतांना अनेक गोष्टी भूतकाळात घेऊन गेल्या...
सिनेमा पाहतांना आमच्या घरी काम करणाऱ्या सगळ्या कामवाल्या बायका आठवल्या.. त्यांची आमच्या वयाची मुले आठवली, ज्यांनी लहानपणी आमच्यासोबत धिंगाणा केला पण दहावीनंतर शाळा सोडली ती कायमची...
आमचा शांत आणि सुस्वभावी वॉचमन दिनेश आठवला जो रात्री शाळेत जात असे.. माझ्यासोबत दहावीला होता आता कुठे असेल तो???
माझ्यासोबत डेटा एन्ट्रीचे डेली वेजेसवर काम करणारा मित्र विलास आठवला... शेवटचा भेटला तेव्हा तो एका ट्रॅव्हल एजन्सी मध्ये कामाला होता आणि मी मुंबईला स्वप्न गाठोड्यात बांधून घेऊन निघालो होतो..त्याने मला ओळख दिली नाही...आणि मलाही अवघडल्यासारखे वाटले...
माझे आयुष्य बदलले पण तो कुठे असेल????
स्वरा भास्कर ला ठिकठिकाणी काम करतांना पाहून आमचे बाबा आठवले ज्यांनी ढोरासारखी मेहनत करून आम्हाला मिडल क्लास मध्ये आणले... आईची कळकळ आणि आमची बेफिकीर वृत्ती सुद्धा आठवली...
स्वरा भास्कर च्या मुलीचे वर्तन पाहून आम्ही घेतलेले लोकांचे तळतळाट आठवले... आपल्याला सोडून गेलेली माणसे यशस्वी आयुष्य जगत असतांना 'आपण त्यांच्या लायक नाही म्हणून ते गेले' हा भाव आठवला...
आणि जे जे आपल्याला नाकारले गेले ते ते सगळे परत मिळवायचे ही जिद्द सुद्धा आठवली...
सिनेमा संपून 1 तास झाला........पण अजूनही गळ्याशी दुखत आहे... पुरुषाने रडू नये म्हणतात.....
असो. सिनेमा नक्की पहा आणि कसा वाटला तेही कळवा....

