Saturday, 27 February 2016

मनोज वाजपेयी, Homosexuality आणि भिकू म्हात्रे... स्वैर विचार..

मनोज वाजपेयी, Homosexuality आणि भिकू म्हात्रे... स्वैर विचार..

वयाच्या 27व्या वर्षी मनोज वाजपेयीला पहिले व्यवसायिक यश मिळाले ते सत्या मधल्या भिकू म्हात्रेच्या स्वरूपात..त्याआधी तो स्वाभिमान (1994) या सिरियल मध्ये लॉयर (सुनील) होता हे फारसे कोणाला आठवतही नसेल..

तर मुद्दा हा की हा माणूस तेव्हापासून आपला आदर्श राहिला आहे... याने सत्याच्या रोलसाठी ऑडिशन दिली होती आणि निवड होऊनही फक्त दिग्दर्शकाच्या आग्रहाखातर भिकू म्हात्रेचा दुय्यम रोल त्याने accept केला..

"मुंबई का भाई कौन?? भिकु म्हात्रे...." असे समुद्रकाठच्या  दगडावर उभे राहून ओरडणारा भिकू आठवला की अजूनही अंगावर शहारा येतो...लहान गावातल्या माझ्यासारख्या टीनेजरला मुंबईचे पहिल्यांदा आकर्षण वाटले ते फक्त याच्यामुळे..अजूनही भिकू म्हात्रे हा माणूस खोटा आहे हे खरे वाटत नाही..वाटते भेटेल तो कुठे तरी.. एखाद्या अरुंद गल्लीमध्ये...:)  #भिकू_म्हात्रे #EternalCharacter

नंतर शूल राजनीती आरक्षण आणि वासेपूर आले आणि एक कायमचा ठसा उमटवून गेले... आज पाहिलेल्या अलिगड मधला वयस्कर म्हातारा प्रोफेसर त्याने जो रंगवला आहे तो मात्र शब्दात पकडता येत नाही...

अनेक वर्षे एकटेपण अनुभवल्याने स्वभावात आलेला विक्षिप्तपणा, आपले sexual orientation gay ह्या तीन शब्दांपलीकडे आहे किंवा कोणत्याही कवितेचा अर्थ शब्दात नसून तो तिच्या अंतरंगात आहे...पोकळीत आहे असे सांगताना त्याचे एक्सप्रेशन... निव्वळ लाजवाब आहेत...

पोळ्याला दगड मारल्यावर मधमाशा जशा झुंडीने उडतात तसे अनेक विचार हा सिनेमा आपल्या डोक्यात सोडून जातो...

homosexual असणाऱ्या लोकांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन नेहमीच हेटाळणी आणि तिरस्कारयुक्त का आहे? आपल्या नामांकित शिक्षण संस्थांमध्ये राजकारणामुळे असे किती चांगले लोक बळी जात असतील? मुळातच दबलेल्या माणसाला अजून दाबण्यात समाजाला कोणता विकृत आनंद मिळत असेल? या सिनेमात दाखवलाय तसे संवेदनशील पत्रकार खरंच किती असतील आणि त्यांची ही संवेदनशीलता किती काळ टिकत असेल? सिनेमातला प्रोफेसर श्रीनिवास सिरस कोर्ट केस जिंकूनही का हरला?

My Brother Nikhil या सिनेमाने #LGBT कम्युनिटीकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन बदलला..पण तो सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला..कदाचित या सिनेमाचे ही हेच भविष्य असावे... कारण critical acclaim ने पोट भरत नाही आणि त्यासाठी लोकांना चिकनी चमेली आणि हनी सिंगूच पाहिजे...

प्रॉफिटची नाही पण हा सिनेमा पाहून #homosexuality बद्दल निदान काही लोकांचे तरी मत बदलेल हीच अपेक्षा आहे...

सिनेमा नक्की पहा... थेटरात पहा... कमी स्क्रीन मिळाल्याने याचे तिकीट महाग आहे.. भलेही 4 सिगरेट कमी प्या पण हा सिनेमा पहा..󾌵

टीप : जे पीत नाहीत त्यांनी मला तसे मला सांगायला येऊ नका.. कारण ही फार काही भूषण वाटावी अशी गोष्ट नाही...तुम्ही 4 ग्लास दुदु कमी प्या.. हा हा हा

#Aligarh #ManojVajpayee #Salute #Movie #Bollywood

Friday, 12 February 2016

एका बुडलेल्या कर्जाची कहाणी...

सामान्य माणसाने सर्व genuine कागदपत्रे जमा केल्यावर होम लोन दिले जाते... फक्त 4 हप्ते चुकले की त्याला बँकेची नोटीस जाते... मग फोनवर आणि घरी छपरी लोक पाठवून अपमान केले जातात... नंतर 60 दिवसांत सुधारणा न झाल्यास 19(2) नोटीस दिली जाते... मग पुढच्या 30 दिवसानंतर 19(4) नोटीस देऊन symbolic पझेशन घेतले जाते... घरावर बँकेची नोटीस चिकटवून खुलेआम त्याची वाजते... मग 45 दिवसांत कोर्टात न गेल्यास घर विकायला काढले जाते... पेपर ला ऍड वगैरे देऊन बोली लावून घर विकले की केस बंद...

हा माणूस पैका जमवून कोर्टात जरी गेला तरी बँकेचे पॅनल lawyer मोठ्या कौन्सेल ला लावतात... त्याच्यासमोर याचा कमी फी वाला वकील उभा राहू शकत नाही आणि हा संपतो...

मोठ्या कंपन्या मात्र दिखाऊ कागदपत्रे जमा करून आणि एकच प्रॉपर्टी 10 बँकांना तारण ठेऊन OD, TL सारख्या 4-5 वेगवेगळ्या facilites असलेले लोन घेतात... मग परत करायचा कोणताच इरादा नसल्याने ते अर्थातच बुडते...

खरा फरक पडतो तो या नंतर... बँका त्यांना विनंती करतात की प्लिज लोन चा हप्ता द्या... हवे तर आम्ही व्याज माफ करून नव्याने हप्ते बनवून देतो... (याला Asset Reconstruction म्हणतात)

मग ते केल्यावर पुन्हा हप्ते अडकतात... असे 2 3 वेळेस झाले की बँकेला हे कर्ज परत येणार नाही हे समजते... पण तसे जाहीर केल्यास या नुकसानीची तरतूद करावी लागते... त्यामुळे प्रॉफिट कमी होतो आणि शेअर price सुद्धा...

मग हे कर्ज (NPA) Asset Reconstruction कंपनीला विकले जाते आणि त्यांचे पॅनल lawyer अग्रेसीवली कोर्टात जातात...ARCIL IARC आणि इतर अनेक कंपन्या हे काम आवडीने करतात... प्रॉपर्टीवर अनेक बँकांचा चार्ज असल्यास त्यांच्याशी भांडतात नाहीतर त्यांच्याकडून हे अकाउंट (कर्ज) विकत घेतात..

या सगळ्यात ती दिखाऊ प्रॉपर्टी विकून कर्जाची रक्कम कधीच मिळत नाही... आणि जे काही मिळते ते मिळायला 10+ वर्षे लागतात...

जिकडे मिळायची शक्यता आहे ते लोक मग BIFR / AIIFR ला रेफरन्स पाठवतात... ह्या सरकारी संस्था रिपोर्ट उशिरा देऊन यांना मदत करतात... इतके सगळे झाले तरी या निर्णयाला DRAT मध्ये आणि त्या नंतर हाय कोर्ट आणि सुप्रीम कोर्टात अपील करता येते आणि त्यावर निर्णय येईपर्यंत सगळ्यांचे हात बांधलेले असतात...

आम्ही गरीब आहोत / मोठे नुकसान झालेय असे म्हणून बँकेला पैसे न देणारे हे व्यापारी वकिलांना मात्र त्यांच्या योग्यतेनुसार एका अपिअरन्स साठी 5 हजार ते 3 लाख रुपये मोजतात... drafting आणि मिसलेनिअस अप्लिकेशन आणि वरखर्च वेगळा....अशा प्रकारे हे प्रकरण लांबवले जाते...

त्यात कधी डिफॉल्टर व्यक्ती स्वर्गवासी होते... त्यांचे लांबचे नातेवाईक केस मध्ये येतात...मग नव्याने त्यांना वकील नेमून प्रतिज्ञापत्रे (affidavit) द्यावी लागतात... कौन्सेल येऊ न शकल्याने सुद्धा काही महिने डेट घ्याव्या लागतात...

आणि जर एकदम भारी वाला बिझनेसमॅन असेल (जसे की ढेकणेश अंबानी किंवा मल्ल्या सांड) तर डायरेक लगे वरून (मिनिस्टरी) ऑर्डर येते की शांत रहा...

आणि मग वरून फोन आल्याने ज्याने काहीच कागदपत्र न पाहता लोन approve केले त्या मिडल क्लास मॅनेजरच्या कोर्टात वाऱ्या चालू होतात...

15 वर्षांपूर्वी तुम्ही या दिवशी या तारखेला मॅनेजर केबिन मध्ये याला भेटले... सान्गा काय बोललात ते...सही तुमचीच आहे... याचे परिणाम जाणता ना??? वगैरे वगैरे...

समोरचा माणूस हार्टबीट वाढून अस्वस्थ झाला की असे प्रश्न विचारणारा जाणकार वकील विजयी मुद्रेने कोर्टाकडे पाहतो...

आमच्यासारखे शिकाऊ वकील त्याच्याकडे कौतुकाने पाहतात आणि बाहेर येऊन सुट्टा मारत हि स्टोरी आपल्या 'हि'ला सांगतात....

तात्पर्य : वकिलीत लय पैसा आहे... हा हा हा

Thursday, 4 February 2016

निर्वासित आणि उंदीलमामा...

निर्वासित आणि उंदीलमामा...

नेहमीप्रमाणे त्याने ऑफिसला जाणारी लांब पल्ल्याची बेस्ट बस पकडली.. सकाळी कमी गर्दीची वेळ असल्याने आरामात जागा मिळाली आणि त्याने पेपर उघडला... डोक्यात आज दिवसभराचे आणि येणाऱ्या विकेंडचे प्लॅनिंग....

तेवढ्यात त्याची बस थांबली आणि लोक एक एक करून बस मधून खाली उतरू लागले... काही विशेष नसेल आणि थोड्याच वेळात सगळे नीट होईल असा विचार करून ह्याने दुर्लक्ष केले... शेवटी याच्यासहित सर्वलोक खाली उतरले आणि बस नादुरुस्त झाल्याने दुसरी बस घ्या असे सुचवण्यात आले...

इतक्या वेळ आरामात बसलेल्या त्याला आता नवीन बस मध्ये जमेल तसे ऍडजस्ट व्हावे लागते.. पाऊण उभे राहून पाठीला रग लागली आणि पुढे दिवसभर फ्रेश असण्याचा कल्पनेने सुद्धा त्याला थकवा आला..

मग त्याने बेस्ट बस वाल्यांना थोड्याफार शिव्या दिल्या आणि नंतर आपल्या नशिबाला...मग त्याला वाटते की वरवर पाहता साधा वाटणारा हा बदल आपल्याला इतके अस्वस्थ करू शकतो तर काश्मीर किंवा फाळणी वाल्या निर्वासितांचे काय झाले असेल...

सर्व लोक बस मधून उतरत असतांना आपण आळस केला.. हा विचार करून की गोष्टी आपोआप पहिल्यासारख्या होतील .. त्या विचारात आपण पाठची बस सोडली असेल का?

कुठलाही analysis न करता बदलाला (change) सामोरे जाणारे Who moved my Cheese मधले दोन उंदीलमामा आणि ever-aggressive दिल्लीवाले (निर्वासित) यांच्याबद्दल आपुलकी वाटली...

असो... आज फ्रायडे आहे... no more serious thoughts...󾌵

तेज धार...

मोठ्या लोकांची दुखणी आणि फेसबुकचा बेजबाबदारपणा...

लहानपणी मधुमेह हा मोठ्या (श्रीमंत) लोकांना होणार आजार आहे असे ऐकले होते त्यामुळे त्याबद्दल तितका सिरीयस विचार नाही केला..पण आईला डायबेटिस झाल्यावर कळले की हा आजार सामान्य लोकांना ही होतो आणि भयंकर त्रासदायक सुद्धा आहे...

इन जनरल आपण मोठ्या लोकांच्या दुखण्यांकडे फारसे लक्ष देत नाही.. मग त्या रेसिडेंट डॉक्टरांच्या समस्या असोत किंवा शहरातल्या मिडल क्लास वाल्यांच्या...आपली सिम्पथी / empathy आपण गरीब, खेड्यातील लोकांसाठी राखून ठेवलेली असते.. मग भलेही तिची गरज असो अथवा नसो..

फेसबुकवर सुद्धा हेच बघायला मिळते...लाइकच्या स्वरूपात  जास्त प्रतिसाद मिळणाऱ्या लोकांना जो त्रास होतो तो आपण त्यांचे नखरे किंवा अतिशहाणपणा म्हणून इग्नोर करतो...

मग असाच कोणीतरी खोडकर मुलगा येतो आणि आपल्याला म्हणतो की मला तुझ्या लिस्ट मध्ये घे नाहीतर वाट लावेल.. आपण त्याला मजेत घेतो..गोड बाळ वगैरे समजून... मग तो आपण लिहिलेली पोस्ट आपल्या वॉल वरून डिलिट करतो... हो हे शक्य आहे... मग आपले अकाउंट अश्लील म्हणून रिपोर्ट होते.. मग आपले अकाउंट 3 दिवसांसाठी फेसबुक कडून ब्लॉक केले जाते... असे 2-3 वेळेस झाले की फेसबुक आपल्याला अनिश्चित काळासाठी ब्लॉक करते...

आपले अस्तित्व आता फक्त एका अकाउंट पुरते मर्यादित असते... आपल्याला इकडे लाइक, कमेंट, मेसेज काहीच करता येत नाही... ज्या फेसबुकवर आपण एकेकाळी कॉलेज कट्टयासारखा धिंगाणा घातला, खूप छान छान लोकांशी बोललो, बरेच काही शिकलो... तिकडे आता त्यांच्याशी काहीच संपर्क करता येत नाही... त्यांचे मेसेज आल्यावर रिप्लाय करता येत नाही...

फेसबुकने आपल्याला एका झटक्यात परके (की पोरके)  केलेले असते....फेसबुकला कुठेच आणि कसेच आपले म्हणणे ऐकून घ्यायचे नसते... पोलीस मदत करतात पण किती लोक त्यांच्याकडे जाऊ शकतात?

आणि या सगळ्यात आपले मित्र आपलीच मजा घेत असतात... तू लै वकिली दाखवत होतास... हिरो बनत होतास... वगैरे बोलून....या सगळ्यात एंटरटेनमेंट value भरगच्च असल्याने त्याला Angry young man type हिरो बनवले जाते...

अर्थात इतर लोकांना हा व्यक्ती गंमतशीर वाटत असल्याने हा त्यांचा दोष नसतोच... कारण काही काळापूर्वी तुम्ही सुद्धा त्या प्राण्याला गोड भूभु समजत असता.. नंतर कळते हा तर नदीतील साप आहे...बोटीतल्या लहान मुलांना विनाकारण त्रास देणारा...

आम्हाला या आजाराचा त्रास फारसा नाही कारण आम्ही फेसबुक, ब्लॉग किंवा website वर लिहून आपले पोट भरत नाही...आमची वट आहे आमच्या कोर्टात...अर्थात तिकडे आपली भेट व्हावी अशी इच्छा नाहीच...

काहीच अपेक्षा नसतांना सुद्धा फेसबुक ने आमच्या पदरात चांगल्या लोकांचे दान घातले आहे...त्याबद्दल फेसबुकचा आभारी आहे पण मला असे कधीही ब्लॉक करायला किंवा बेदखल करायला मी कोणाचा मिंधा नाही...म्हणून हा त्रास होतो आहे...

आणि ज्याने हे केले त्याचा हिशोब तर होणारच आहे... आपल्याला अजिबात घाई नाही...आणि तळतळाट वगैरे देण्याइतके आपण कमजोर नाही.... देव त्याला ही फळे चाखण्याची शक्ती देवो ही इच्छा....

आदरणीय बिल्लाभाई (संजय दत्त) चा डायलॉग खास तुझ्यासाठी...गाणे तेज धार... सिनेमा मुसाफिर...(2004)

जान बच गई तो नींद चली जायेगी
नींद कभी आ भी गई तो चिखता हुआ कांपता हुआ जागेगा तू
बार बार.....
अंहंहंहं... तेज धार....

बोल कहा छुपेगा.... कहाँ छुपेगा बोल...
ऐसी कोई जगह नही जहाँ बचेगा....

 सीनाजोरी चोरी या हरामखोरी.....
इसका तो एक ही जवाब है यार.....

तेज धार......