प्रत्येकाला आपले स्वतंत्र आयुष्य जगायचा अधिकार असतो..आपले निर्णय स्वतः घेणे सोपे असले तरी त्यांची संपूर्ण जबाबदारी घेण्याची प्रव्रुत्ति मात्र दिसत नाही आणि या जबाबदारी झटकण्यातुन नाती कोमेजतात..
राजवाडे & सन्स ही अशाच एका जॉइंट फॅमिली ची गोष्ट आहे.. मराठी सिनेमातले घर शक्यतो मधमवर्गीय असते आणि व्हिलन महालात असतो.. पण हे राजवाड़े शब्दशः महालात राहणारे कुटुंब आहे जिकडे सर्व भौतिक सूखे पायाशी लोळण घेतात पण प्रत्येकाच्या मनात काही न काही निसटल्याची भावना आहे...
आजोबांची घराला घट्ट बांधून ठेवायची तळमळ असली तरी तिसऱ्या पिढीचा श्वास त्यात गुदमरतो आहे.. मधली पीढ़ी आता आपल्याला काहीच बदल करणे शक्य नाही या वैफल्यात कुठेतरी गोंधळलेली आहे...
अशा या घरात एक माणूस येतो..त्यांच्यातलाच..पण फार पूर्वी घर सोडून पळालेला आणि आता जग पाहुन परत आलेला..त्याच्या येण्याने घरात सांस्कृतिक उलथापालथ होते आणि कोंडलेले श्वास आणि मने मोकळी होतात.. आपल्याच माणसांची नव्याने ओळख होऊन घराची घडी बसत असतांनाच हा नवीन माणूस परत निघुन जातो..तो परत कधीच न येण्यासाठी...
फार पूर्वी अशोक सराफ यांचा खिचड़ी नावाचा मराठी सिनेमा होता..त्याची आपल्याला आठवण आली तरी हा सिनेमा कोणत्याही फॉरमैट मध्ये बसत नाही इतका हा प्रचंड वेगळा आणि सुंदर आहे..
यातले बोल्ड सीन आपल्याला अश्लील वाटत नाहीत, यातली स्वतंत्र व्यक्तिमत्वे आपल्याला स्वैराचारी वाटत नाहीत, यातला सामान्य माणूस आपल्याला बोरिंग वाटत नाही, यातले कड़क आजोबा आपल्याला खाष्ट वाटत नाहीत.. विशेष म्हणजे यातले डबल स्टैंडर्ड्स ने वागणारे लोक सुद्धा आपल्याला प्रामाणिक वाटतात..
आयुष्यात साध्या साध्या गोष्टी राहून जातात आणि प्रत्येक वेळी आर्थिक परिस्थिती हेच कारण नसते हे या सिनेमाने दाखवून दिले...
डोंबिवली फ़ास्ट मधल्या माधव आपटेला आयुष्यभर लोकल ट्रेन मध्ये विंडो सीट मिळाले नाही म्हणून तो शेवटच्या प्रसंगात गोळी लागल्यावर विंडो सिट वर बसून प्राण सोडतो आणि आपण आवंढा गिळत थेटर सोडतो...
गरीबी दाखवून प्रेक्षकांना रडवणे सोपे आहे असे गृहीत धरल्यास राजवाड़े घरातल्या लोकांबद्दल सुद्धा असेच दाटुन येणे हे या सिनेमाचे यश आहे... बाकी कलकारांबद्दल जितके बोलावे तितके कमी आहे... प्रत्येकाच्या वाट्याला आलेल्या भूमिकेचे सोने झाले आहे... त्यासाठी दिग्दर्शकाला कड़क सलाम...
हा सिनेमा नक्की थेटर मध्ये पहा... आणि मला सांगा काय वाटले... तुम्हाला आपली माणसे यात नक्की दिसतील...
#राजवाड़े #मराठी #सिनेमा #Rajwade
राजवाडे & सन्स ही अशाच एका जॉइंट फॅमिली ची गोष्ट आहे.. मराठी सिनेमातले घर शक्यतो मधमवर्गीय असते आणि व्हिलन महालात असतो.. पण हे राजवाड़े शब्दशः महालात राहणारे कुटुंब आहे जिकडे सर्व भौतिक सूखे पायाशी लोळण घेतात पण प्रत्येकाच्या मनात काही न काही निसटल्याची भावना आहे...
आजोबांची घराला घट्ट बांधून ठेवायची तळमळ असली तरी तिसऱ्या पिढीचा श्वास त्यात गुदमरतो आहे.. मधली पीढ़ी आता आपल्याला काहीच बदल करणे शक्य नाही या वैफल्यात कुठेतरी गोंधळलेली आहे...
अशा या घरात एक माणूस येतो..त्यांच्यातलाच..पण फार पूर्वी घर सोडून पळालेला आणि आता जग पाहुन परत आलेला..त्याच्या येण्याने घरात सांस्कृतिक उलथापालथ होते आणि कोंडलेले श्वास आणि मने मोकळी होतात.. आपल्याच माणसांची नव्याने ओळख होऊन घराची घडी बसत असतांनाच हा नवीन माणूस परत निघुन जातो..तो परत कधीच न येण्यासाठी...
फार पूर्वी अशोक सराफ यांचा खिचड़ी नावाचा मराठी सिनेमा होता..त्याची आपल्याला आठवण आली तरी हा सिनेमा कोणत्याही फॉरमैट मध्ये बसत नाही इतका हा प्रचंड वेगळा आणि सुंदर आहे..
यातले बोल्ड सीन आपल्याला अश्लील वाटत नाहीत, यातली स्वतंत्र व्यक्तिमत्वे आपल्याला स्वैराचारी वाटत नाहीत, यातला सामान्य माणूस आपल्याला बोरिंग वाटत नाही, यातले कड़क आजोबा आपल्याला खाष्ट वाटत नाहीत.. विशेष म्हणजे यातले डबल स्टैंडर्ड्स ने वागणारे लोक सुद्धा आपल्याला प्रामाणिक वाटतात..
आयुष्यात साध्या साध्या गोष्टी राहून जातात आणि प्रत्येक वेळी आर्थिक परिस्थिती हेच कारण नसते हे या सिनेमाने दाखवून दिले...
डोंबिवली फ़ास्ट मधल्या माधव आपटेला आयुष्यभर लोकल ट्रेन मध्ये विंडो सीट मिळाले नाही म्हणून तो शेवटच्या प्रसंगात गोळी लागल्यावर विंडो सिट वर बसून प्राण सोडतो आणि आपण आवंढा गिळत थेटर सोडतो...
गरीबी दाखवून प्रेक्षकांना रडवणे सोपे आहे असे गृहीत धरल्यास राजवाड़े घरातल्या लोकांबद्दल सुद्धा असेच दाटुन येणे हे या सिनेमाचे यश आहे... बाकी कलकारांबद्दल जितके बोलावे तितके कमी आहे... प्रत्येकाच्या वाट्याला आलेल्या भूमिकेचे सोने झाले आहे... त्यासाठी दिग्दर्शकाला कड़क सलाम...
हा सिनेमा नक्की थेटर मध्ये पहा... आणि मला सांगा काय वाटले... तुम्हाला आपली माणसे यात नक्की दिसतील...
#राजवाड़े #मराठी #सिनेमा #Rajwade


