Thursday, 20 August 2015

Linkedin

करिअर मध्ये स्ट्रगल करणाऱ्या प्रत्येकाला Linkedin पाहिले की भयंकर फ्रस्ट्रेशन येत असावे... Everyone seems to be sorted with their life and at the end of the day you are still clueless...

लोक आपले सर्टिफिकेशन, कॉलेज बद्दल भरभरुन लिहितात.. फॉरेन क्लाइंट्सचे टेस्टीमोनियल...डिरेक्टर्स ओनली ग्रुप्स... आणि बरेच काय काय असते तिकडे... निदान मी तरी असे पाहुन शेकडो वेळेस डोके धरून बसलो आहे.... की... आपल्याकडे सगळे असून काहीच नाही असे का आहे....

तर.. सांगायचा मुद्दा हा.. काल आणि परवा 138 लोकांना फ्रेंडलिस्ट मधून हाकलुन दिले.. आणि बिग्रेडी लोकांच्या काही रिक्वेस्ट पण ब्लॉक केल्या..
यातून काय मिळालं? खुप समाधान... :)

12 वर्षे सतत लोकांचे रिजेक्शन घेणारा रॉकेटसिंग परवापासून स्वतःच "रिजेक्शन मोड़" वर आलाय... Feeling Happy.. :)

असे वाटण्यात विकृति असेलही.. पण आपल्याला आवडलं हे.. विषय संपला ;)

जब आप खुदसे प्यार करने लगते हो..तो जिंदगी नयी लगने लगती है... - श्रीदेवी (English Vinglish)

Note : I believe in deriving real pleasure (and people) from virtual world.. परत..इषय कट...... हा हा हा

#Rocketsingh

Thursday, 13 August 2015

आत्मचरित्र..

आत्मचरित्र..

प्रत्येकाने योग्य वेळ येताच आपले आत्मचरित्र लिहावे असे आम्हाला वाटते. आपल्याला आलेले अनुभव आणि त्यातले Learnings हे लिखित स्वरुपात असल्यास त्याचे अनेक फायदे होऊ शकतात पण आत्मचरित्र फ़क्त यशस्वी व्यक्तीने लिहावे असा संकेत आहे आणि आपला सर्वांचा या बाबतीत इन जनरल भिडस्त स्वभाव असल्याने आपण ते टाळतो..

माझे आजेसासरे (स्व.सखारामपंत मुळे) यांनी आत्मचरित्र लिहिले होते आणि मला ते लग्नाआधीच वाचायला दिले होते..आधी ज़रा विचित्र वाटले की इतकं काय लगे आत्मचरित्र अन काय...त्यात आम्ही मुंबईला असल्याने त्यांच्यासोबत फारसा सहवास आला नाही आणि ते मागच्या वर्षी गेले..
पण या पुस्तकामुळे अजूनही त्यांची आठवण येते.. त्यांच्याबद्दल आत्मीयता आणि आदर वाटतो..त्यांनी हे पुस्तक लिहिले नसते तर त्यांच्याबद्दल कधीच काही फारसे कळले नसते.. कारण आठवणींमधला माणूस हा त्याच्या नातेवाइकांचे फ़क्त परसेप्शन असतो.. त्याच्या खऱ्या रूपाशी ओळख फ़क्त आत्मचरित्रानेच होऊ शकते...

माझ्या बाबांबद्दल या वर्षी 1 मार्चला पोस्ट लिहिली तेव्हा कितीतरी लोकांना त्यांचा प्रवास प्रेरणादायक वाटला..कोणाला ते Unsung hero वाटले..त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन उद्या आमचे किंवा अजुन कोणाचे भले झाले तर हा विजय कोणाचा असेल? अर्थातच त्या हातगाडीवाल्या मुलाचा आणि Bata शो रूम मधल्या सेल्समनचा...

वय वाढेल तसे माणूस विक्षिप्त होऊ लागतो (आम्ही आताच आहोत ते जाउद्या..हा हा हा) अशा वेळेस घरात येणाऱ्या नवीन सूना, जावई यांना हे पुस्तक वाचायला मिळाले तर त्यांना मनाने एकत्र यायला आणि एकमेकांना एक्सेप्ट करायला किती मदत होईल..

आपल्याला उद्ध्वस्त करणारे काही अनुभव जर कोणाला श्रीमंत करून जात असतील तर त्याहुन आनंदाची गोष्ट काय असू शकते?
सहसा आईबाबांशी सुसंवाद नसलेली मुले वाया (!) जातात असे निरिक्षण आहे..मुलांना आपले आईबाबा आजकाल कमी वाटयाला येतात..असे काही वाचून त्यांच्यातला संवाद वाढला तर त्याची किंमत पैशात मोजता येईल का? 6-8 महिन्यांच्या ओळखीवर आयुष्याची गाठ बांधणाऱ्या दोन व्यक्तींना या प्रकारच्या पुस्तकाचा किती फायदा होईल?? कदाचित पैशात न मोजता यावा इतका..

अर्थात यात खरे-खोटे आलेच..पटणे किंवा न पटणे सुद्धा आले..आणि आत्मचरित्र लिहिण्याची योग्य वेळ कोणती हा प्रश्न सुद्धा आला...
पण रिक्तपणाकड़े झुकणाऱ्या नात्यांना याने थोड़ा आधार मिळेल हे नक्की.. :)

Needless to say.. मी स्वतःबद्दल लिहिणार आहे.. पब्लिश होईल याची खात्री नाही.. पण लिहिणार..
निदान जवळच्या लोकांना कळले पायजेले.. पोरगा छपरी असला तरी अगदीच 'हा' नव्हता.. हा हा हा  ;)

Wednesday, 12 August 2015

Whatsapp is Great..;)

Whatsapp उघडले की गुदमरल्यासारखे होते अशी आमच्या महेंद्रभाउंची पोस्ट आता वाचली आणि तिकडे ‪#‎WhatsApp‬ वर भेटलेल्या व्यक्ति आणि वल्लींबद्दल बोलावे वाटले.. त्यांचे विशेष 'फीचर्स' नाव न घेता सांगतो आहे..तुम्ही ही असे मजेशीर लोक कळवा.. आवडती उदाहरणे पोस्ट मधे एडिट करून टाकतो :)

एक अब्राह्मण व्यक्ति स्वतःला "मी 21व्या शतकातील ब्राह्मण" असे संबोधित असे.. अतिशय मोठ्या आणि मलाईदार सरकारी पोस्ट वरुन रिटायर झालेले बाबा आणि ओवरऑल सुशिक्षित असल्याने स्ट्रगल आणि यांचा संबंध शून्य.. मग बळेच हे आपल्या स्ट्रगल आणि सत्शील असण्याच्या स्टोरी बनवून सांगणार..आणि तुम्ही जातीने ब्राह्मण असले तरी वागण्याबोलण्याने नीच आहात असे आम्हाला ऐकवणार..

एक व्यक्ति आपल्या ग्रुप मध्ये आपले वर्चस्व असावे म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करणार..त्यासाठी विविध मुखवटे घालणार..आम्ही वरचढ़ होऊ लागलो असे कळले की आमची प्रतिमा मलीन करणार..
काही व्यक्ती सतत आपल्यावर डुख धरून असणार.. कधी चिमटा घ्यायला मिळतोय याची वाट पाहणार.. शिवाय आग भडकली की I was joking...असे म्हणून स्माइली काढणार.. आणि छद्मिपणे दुसर्यांच्या भावना जळतात ते एंजॉय करणार..

काही आदरणीय आणि जवळच्या व्यक्ती अतिशय विकृत वीडियो, मेसेज, इमेजेस आपल्याला must watch म्हणुन देणार..आपण वैतागलो की त्यात आनंद घेणार..
आपल्या भोगाला आलेले निदान दुसर्याला देऊ नए हे यांच्या गावीही नसते..

काही व्यक्ति तुम्ही माझ्या मेसेजला वाचूनही का रिप्लाय देत नाही म्हणून भांडत बसणार..लास्ट सीन, निळे टिक्स हे त्यांच्या पथ्यावर पड़ते..

काही व्यक्ति I am always with you..count me in.. वगैरे सतत बोलणार.. आणि अगदी लहानशी मदत खरच मागितली की कामात बिझी होणार...किंवा त्यावर रिप्लाय न देता जोक पाठवणार..

एका 'आम्ही देशपांडे ' ग्रुप वरच्या पोराने तुमचा पगार काय असे विचारले.. म्हटलं कशाला.. (तेरी भेन से शादी करारा क्या???) असे वाक्य तोंडाशी आले पण गिळले..

काही लोक आलेले मेसेजेस फॉरवर्ड करून आपण तसेच संत आहोत हे लोकांना सांगणार.. त्यावर आमची बी लाल असे काही लोक अनुमोदन देणार..

काही लोक गुड़ मॉर्निंग--गुड़ आफ्टरनुन--शुभसंध्या--गुड़ नाइट--या जेवायला असे अतिशय भावपूर्ण मेसेज टाकायला फ़क्त अवतरणार..जोड़ीला रेडीमेड फ़ॉर्वर्डेड फ़ोटोज पण देणार...

काही ग्रुपचे सदस्य एकेमकांशी पर्सनल चाट करणार आणि ग्रुप मध्ये वेगळे आणि टारगेटेड बोलणार..

एका ब्राह्मण ग्रुप मधून आम्हाला हाकलले.. "मारझोड़ आणि शिव्या ह्या गोष्टी आपण करू नए.. आपल्याकडे विचारांची ताकद आहे.."
या महान सिद्धांताला आम्ही विरोध केला... हा हा हा

आमचे व्हाट्सअप प्रेम व्रुद्धिंगत होण्यात यांचा आणि आशा बऱ्याच लोकांचा हातभार आहे...

टिप : फेसबुक X व्हाट्सअप असा वाद घालायचा नाही.. सगळे वाइट आहेत असे म्हणत नाही..whatsapp चे फायदे आहेतच...पण त्यावर वेगळी पोस्ट बनेल..
आणि या महान व्यक्ती कोण हे विचारू नका..उत्तर इनबॉक्स मध्ये पण मिळणार नाही.. हा हा

'डॉक्टर्स डे'

मृणाल तुला 'डॉक्टर्स डे'च्या शुभेच्छा.. खरं तर हे डेझ वगैरे निमित्त आहे..आपण त्याला मानत नाही..पण तुझी वटसावित्रीची पोस्ट वाचल्यापासून हे लिहायचे ठरवले आहे..

त्या पोस्ट मध्ये आपल्या आईसारखी गृहकृत्यदक्ष बायको आजच्या जनरेशनला मिळणार नाही असे म्हणालीस ना तेव्हाच वाटलं की सावित्रीची व्याख्या बदलेल पण ती संकल्पना तशीच intact राहील..
"तू बिनधास्त जॉब सोड रे..पुढे 2,3 वर्ष घर मी सांभाळते..तुला आवडतय ते कर.." असं तू म्हणालीस त्याला या जून महिन्यात एक वर्ष झाले आहे...
 

माझ्या वाईट काळात तर तू माझ्या सोबत होतीसच पण स्वतःचे घर, 4 व्हीलर,chill वीकेंडस् वाले यशस्वी कॉर्पोरेट आयुष्य या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात येणार असे स्पष्ट दिसत असतांना तू मला हे स्वातंत्र्य दिलेस... सगळे मागे सोडून नव्याने संसार मांडण्याचे..

आपल्या सोबतच्या किती मूली हे करू शकतील? माझ्या जर्नालिझम कोर्सची मोठी फी तू भरलीस..फ़क्त माझी अपूर्ण इच्छा पूर्ण व्हावी म्हणून... आपण आपल्या नवर्याचे स्वप्नं पूर्ण करावे असे किती मुलींना वाटत असेल? त्याग जाउदे कोम्प्रोमाईज़ साठी किती मूली तयार असतील??

लग्नाच्या बाजारात जिकडे इस्टेट आणि डिग्र्यांची मौजदाद होते तिकडे तू माणसावर बेट लावलीस.. तुझा घोडा जिंकणार हे नक्की आहे पण तुझा मोठेपणा कोणी अमान्य करू शकेल का? सावित्री तर दंतकथा आहे.. आपण कोणीच पाहिली नाही.. आता तुझ्याकडे पाहुन मला त्या खोट्या (!) बेंचमार्कची तशीही गरज वाटत नाही..

गेल्या एक वर्षात जगलो ते fearless आणि स्वच्छंद आयुष्य मला दिलेस म्हणून आभार मानु की 100% विश्वास ठेवलास म्हणून....मला स्वतःच्या प्रेमात पाडलस म्हणून आभार मानु की माझ्या चक्रमपणाला सामावून घेतलस म्हणून....

पण नको.. आभार मानून त्या भावनांचा अपमान करत नाही.. आज काही नवीन सुरु होत आहे म्हणून तुझ्या वाढदिवसाची वाट न पाहता आजच पोस्ट टाकतों.. तसेही मला Mr.impatient हा किताब दिला आहेसच.. हा हा

दहावी, मार्च - २०००..

दहावी, मार्च - २००० च्या परीक्षेत सुनीता आघाड़े नावाची मुलगी गुणवत्ता यादीत आली होती..बजाज ऑटो मध्ये तिचे बाबा वर्कर होते आणि ते एक खोलीच्या घरात राहत असत.. माझे बाबा त्यावेळेस बजाज ऑटोच्या Spareparts Marketing विभागाचे क्र.२ इनचार्ज (मोठे अधिकारी) असल्याने नेहमी तिच्याबद्दल सांगत की बघ.. कशी परिस्थिति आहे आणि काय यश मिळाले.. (स्वगत - अन तू पहाय...)
दहावीत बरे मार्क्स होते म्हणून याचा जास्त त्रास झाला नाही..

११-१२वी मध्ये 'लाइफ एन्जॉय' करणे चालु असतांना मात्र त्या पोरीच्या कर्तुत्वाचा त्रास व्हायला लागला.. एक दिवस वैतागुन बाबांना म्हणालोच.. म्हटलं बाबा.. तिला दूसरे काही कामं आहेत का? नुसता अभ्यास तर करते सतत...

बाबा म्हणे होना..तुला किती महत्वाची कामं आहेत.. नवीन घेतलेली मित्राची पुस्तके दाखवून माझ्याकडून पैसे घेणे, गाडीची सतत फुल्ल असलेली टाकी रिकामी करण्यासाठी ट्यूशन आणि practicals बुडवून दौलताबाद-हनुमान टेकड़ीला जाणे, सिनेमे पाहणे, मुलींच्या मागे ट्रिपल सीट फिरणे, मुलींना blank call करणे, त्यांचे पत्ते शोधून काढणे, त्यांच्यावरुन भांडणे....
हे सगळे किती महत्वाचे आहे....बारावीचे काय... होत राहील.... हा हा हा.. बरोबर ना?

आम्ही चुपचाप आमची स्वतंत्र खोली गाठली.. आतून कड़ी लावून लाइफ एन्जॉय करणे चालु झाले..
Feeling : लैच छपरी.. ;)

Movie review : '''"नागरिक""

मराठी माणूस हा मोस्ट्ली बाळबोध असतो असे आमचे निरिक्षण आहे.. म्हणूनच जिथे जिथे स्पर्धा असेल तिथे तिथे तो प्रेम, नातेसंबंध, तत्व, फॅमिली वगैरे कारणे सांगून एकतर स्पर्धेपासून दूर पळतो नाहीतर कारकुनी पत्करतो.. स्पर्धाच नको...

श्रीमंती वाईट आणि गरीबी चांगली हे संस्कार घेऊन आलेल्या त्याला स्पर्धेपासून दूर जाण्याचे अनेक excuses मिळत राहतात.. सांस्कृतिक उत्कर्ष हे त्यापैकीच एक.. खिशात 10 रुपये नाहीत, माणसे सुद्धा फारशी जोडलेली नाहीत पण हा मनाने मात्र श्रीमंत (!) असतो.. कसे ते त्यालाच माहीत.. ;)

हे सर्व आठवण्याचे कारण की.... अशा आजारापेक्षा आजारी पडण्याच्या धसकयाने मरणाऱ्या माणसाला खुश करण्यासाठी..... एक सुप्परडुप्पर हीट मराठी सिनेमा आला आहे.. '''"नागरिक""..

ज्यात पन्नाशीतला बालीश पत्रकार, चाळीशीतला स्मार्ट politician, टिपिकल बिल्डर आणि नेते असा अतिशय जगावेगळा कलाकारांचा ताफा असून storyline तर अगदी नजर लागावी अशी आहे..सिनेमा संपला तरी आपल्याला काहीच कळत नाही हे या सिनेमाचे वैशिष्टय म्हणावे लागेल.. हा हा हा

टिप : मराठी माणूस लय भारी आहे...मराठी भाषा, संस्कृती महान आहे अशी कमेंट करण्याआधी मी राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा भक्त आहे हे लक्षात घ्या.. :)
आणि माझ्या 600 रुपयांच्या नुकसानाबद्दल सहानुभूति अपेक्षित आहे..;)
 Feeling : रानगट & रासवट too....

Movie Review : किल्ला

एखादा सिनेमा भयंकर संथ असला की लोकांना विचार करायला वेळ मिळतो आणि there can be various interpretations...it becomes open ended movie...

असे कोणीही काहीही एक्सक्यूज़ दया... पण 'किल्ला' ने काल डोक्याची IB केली हे मात्र खरे...

सिनेमाचे Picturisation छान आहे, प्रत्येक फ्रेम मध्ये हे जाणवते, अजुन काय टेक्नीकल गोष्टी चांगल्या असतीलही.. पण या सगळ्या गोष्टी आपल्या ह्याच्यावर.....
स्टोरी मनाला भिडली नाही......???
बस...खेल ख़तम..दूकान बंद... (सिल्वर मणी in सरकार)


बदलीच्या गावी ट्रांसफर झाल्यावर आई आणि मुलगा कसे एडजस्ट होतात आणि त्यांच्या रटाळ आयुष्यात टिपिकल लोक येतात आणि मग परत बदली होते असे अतिशय हृदयस्पर्शी कथानक आहे.. अमृता सुभाष अतिशय नाटकी आणि सतत रड़की वाटली..तिचा पोरगा तर भयंकर मंद वाटला.. त्याच्या स्लो एक्सप्रेशन साठी एक कानाखाली हाणावी वाटतेय अजूनही..

त्याला टिपिकल जीव लावणारे मित्र भेटतात म्हणे... Bloody hell... अशा पाणचट मुलांची एकच डेस्टिनी / स्टोरी आहे.. फर्स्ट बेंच--एकटेपणा--मेरिट लिस्ट--नोकरी--छोकरी--मुले--पेंशन.. thrill आणि यांचा संबंध फ़क्त सिनेमात येतो...

असले जानवे घालून टवाळया करणारे RANCHOs फ़क्त 3 इडियट्स सारख्या दलिन्दर सिनेमातच असतात...असो...

To the ‪#‎किल्ला‬ team : 300 रुपये परत दे भाड्या... आधीच तंगी चालुए त्यात काशी घातली... हा हा हा

फ्रीडम आणि स्पेस..

फ्रीडम आणि स्पेस..

आज सकाळी एका पोस्टवर या विषयावर चर्चा चालु होती.. नात्यात मोकळीक वगैरे ठीक आहे पण आमच्या मते फ्रीडम आणि स्पेसचा नेमका काय अर्थ घ्यावा हा चिंतनाचा (काळजीचा) विषय होऊ शकतो..

अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये लहान मुलांवर हात उगारायला बंदी आहे म्हणे.. फ्रीडम आणि स्पेस मुबलक असणाऱ्या देशांत मुलांना शिस्त कशी लावत असतील? की त्यांनी कसेही वागले तरी त्यांच्याच कलाने घेत असतील? की त्या विकसित देशातल्या लहान मुलांचा मेंदू सुद्धा जन्मतःच विकसित असेल?

आमच्या MBA च्या दिवसांत एक मुंबईकर मुलगी committed असूनही आम्हाला अप्रोच झाली.. याचे कारण आमचे कॉलेज आठवडयात 6 दिवस रोज 12 तास असायचे.. so she wanted someone to take care of her in college as well.. keeping options open you see..
तिच्या BF ने तिला पूर्ण विश्वास ठेऊन फ्रीडम दिली होती म्हणे.. आता या फ्रीडम आणि स्पेसला काय म्हणावे? मुर्खपणा?

कॉर्पोरेट जगात आमच्या लग्न झालेल्या फीमेल कलीग्स मेल कलीग्सला खेटायच्या..am drunk किंवा am so tensed अशी कारणे देऊन या चांडाळणी भट्टी गरम करणार आणि ऐन वेळेस I am married..you bastard..वगैरे बोलणार...
त्यांच्या नवर्याने पण त्यांना फ्रीडम आणि स्पेस दिलेली असते..ज्याची 3 पेगनंतर त्या आयमाय काढ़तात..

नवी मुंबई पोलिसांच्या रिपोर्ट नुसार MD या लेटेस्ट ड्रगची लागण मुलांना 5वी पासून होते..याचा सततचा वापर दीड वर्षात देवाघरी नेतो इतके हे ड्रग भयंकर आहे.. या वाहयात (!) मुलांना त्यांच्या आई बाबांनी फ्रीडम आणि स्पेस दिलेली असतेच की... ही मुले सुद्धा मिडल आणि लोअर मिडल क्लास मधली आहेत.. श्रीमंत नाही..

 ही सर्व उदाहरणे प्रातिनिधिक असली तरी exceptions नक्कीच नाहीत..डोळे उघडे ठेऊन समाजात वावरणाऱ्या कोणालाही हे दिसेल..स्वातंत्र्य आणि मोकळीक वाहयात व्यक्तीला देणे म्हणजे माकडाच्या हातात जळते लाकुड देण्यासारखे आहे असे आम्हाला वाटते..

छड़ीची भाषा is a must....

संदर्भ :
 MD - Methamphetamine also known as meow meow.. also used largely in BPOs parties

टिप : जे तसे नाहीत त्यांनी हे कृपया प्रूव करू नये..किंवा मला पेसिमिस्टिक म्हणू नये..
आणि मी सुद्धा हे चाळे केले असतील असा convenient विचार करू नये ही नम्र विनंती.. ;) 
वेगवेगळ्या लोकांचा अभ्यास करणे हा माझा छंद आहे.. this is FYI :)

सिगारेट.. :)

आज देवीदासरावांनी एकदम १४ वर्ष मागे नेले..आम्ही नुकतीच सिगारेट नावाची वस्तु अनुभवली होती..तेव्हा औरंगाबाद छोटे गाव होते..16 वर्षाच्या मुलाने स्मोक करणे म्हणजे ज़रा जास्तच होते..तेहि सगळे जग 12वी चे महत्वाचे वर्ष म्हणून अभ्यासात बुडलेले असतांना...

आम्ही बीबी का मकबरा जवळ एका आड़वळणाच्या टपरीवर घाबरत घाबरत 'गोल्ड फ्लॅक' मागितली..तेव्हा साडेतीन रूपयाला मिळायची...मग आम्ही 3 मित्र शहराबाहेर हनुमान टेकड़ीवर गेलो..एक मित्र थोड़ा अनुभवी असल्याने त्याने पेटवून कश घेतला आणि मला दिली.. excitement मध्ये तो कश घेतला आणि आता खोकला येईल असे वाटले पण आलाच नाही..म्हटलं वा आपण आता मोठे झालो.. हा हा..

 मित्रांना उगीच 2,4 शिव्या हासडल्या आणि त्या टेकड़ीच्या पायथ्याशी पळत सुटलो..कशाचा आनंद होता माहीत नाही.. शोएब अख्तर विकेट घेतल्यावर जसा राकट हसत हात पसरुन पळायचा तसा..अर्थात आमचे वजन 50 किलो असल्याने राकटपणा फ़क्त आत होता..

त्या 4,5 महिन्यात ज्या आठवणी आहेत त्याच आयुष्यभर पुरतील असे वाटते..नंतर थोड़े निर्ढावल्यावर घराजवळ कॅनॉट गार्डन ला एक सिगारेट 6 जणांमध्ये वाटून प्यायचो..करिअर, वर्गातल्या मूली, ‪#‎राड़ा‬ आणि ‪#‎भाई_लोक‬ हे आमचे आवडते विषय असायचे..

आता फेसबुकवर "नांदेडची राड़ा करणारी मुले" अशा नावाची प्रोफाइल दिसली की इतके भरून येते की त्या टीनेजर मुलाला एक घट्ट मीठी मारावी वाटते.. पण त्यांच्यासाठी मी आता टिपिकल अंकल झालो हे जाणवते...
नंतर 4,5 महिन्यात ही सवय सुटली आणि पुढे रिझल्ट + बीएसशी एडमिशन (!) असे झटके बसले...

त्यानंतर ना तो जोश अनुभवला ना ती Excitement.. आता एखाद्या वेळेस जुनी आठवण म्हणून दरवर्षी पावसाळयात परत एकटाच टपरीवर जातो.. कट्टयावर बसून 4,5 कश घेतो..आणि टाकून देतो..
उसने अवसान आणणे जमतही नाही आणि पटतही नाही...ओढ़ असते त्या निर्भेळ आनंदाची..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
पहिल्यांदा खोकला न येण्याचे कारण नंतर कळले ते म्हणजे आम्ही तेव्हा inhale केलीच नव्हती..एका अनुभवी मित्राने ते 2 महिन्यांनी शिकवले.. हा हा

 खुप लोकांना कमेंट मध्ये मेंशन करावे वाटत आहे.. पण कोणाला अडचणीत टाकायची इच्छा नाही.. ते जे आहेत त्यांना हे वाचून कळेल की I am missing them.. :) नाहीतर फोन आहेच..

उदाहरणार्थ.....

उदाहरणार्थ.....मी पांडुरंग सांगवीकर वगैरे...

"ऐन विशित सगळीकडून फटके खाऊन हुळहुळा झालेला, स्वतःची काहीही कमाई दाखवता येत नाही असा हा निष्प्रभ नायक आपलं आयुष्य फारशी फेररचना न करता वाचकांना भड़ाभड़ा सांगत जातो..
निव्वळ आपल्या भाषेच्या जोरावर तो वाचकाकडून सिद्ध करून घेऊ पाहतो की यशस्वी होणं किती भंपक असतं? निदान इतरांसारखं परिक्षेला बसून पास होणं तरी त्याला जमण्यासारखं होतच..."

'कोसला'च्या प्रस्तावनेमधल्या या ओळी वाचल्या आणि म्हटलं हे आपलं पुस्तक आहे.. हॉस्टेल लाइफ बद्दल बोलतांना लोक हळवे होतात, भरभरुन बोलतात....आम्हाला मात्र मागे वळून पाहिल्यास असे काहीच सापडत नाही...ना हॉस्टेलची वास्तु ना तिथले मित्र..
कारण आमच्यासाठी हॉस्टेल लाइफ म्हणजे अपुरी झोप आणि प्रत्येक गोष्टीसाठी एकतर तोंड वेंगाडणे किंवा कोणाच्या अंगावर धावून जाणे हा एकच पर्याय असलेले दिवस...

एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातुन पाहिजे तेव्हा न जाणे हा नरक आहे असे वपु म्हणतात..अशा कित्येक व्यक्ती या बान्द्रयाच्या हॉस्टेलला आम्हाला भेटल्या... हरयाणा, राजस्थान, दिल्ली, यूपी-बिहार आणि मध्य प्रदेश या 6 राज्यातल्या सुसंस्कृत लोकांचे ते निवासस्थान होते.. त्यांच्या उथळ, स्वार्थी, दिखावेबाज, भांडखोर, नीच स्वभावाला तोंड देता देता आपणच त्यांच्यासारखे होऊ ही भीति वाटायची..
सोबत कोकण, नागपुर, बुलडाणा, जळगावची बाळबोध आणि घरचा खाऊ चोरून खाणारी पण माझा खाऊ शेयर करणारी मंद मराठी मुले होतीच.. सगळे अपमान सहन करून त्यांच्यात मिसळणारी ती आणि एकाकी आणि मुर्ख आम्ही.. कन्फ्यूज्ड..वरीड...रिकाम्या खिशाचे...

यावर ताण म्हणजे मैनेजमेंटचे प्रोफेशनल शिक्षण देणारे आमचे सांताक्रूजचे फेमस सरकारी कॉलेज जिथे आडनाव पाहुन मित्र ठरवले जायचे.. आणि जगातल्या पाणचट विनोदावर हसणे हे एक कर्तव्य असायचे...

कोसला मधला पांडुरंग सांगवीकर कोणत्याच मित्राशी जास्त कनेक्ट झाला नाही तसेच आम्हाला तेव्हाच्या एखाद दुसरा अपवाद वगळल्यास कोणत्याच मित्राची आज आठवण येत नाही..

आम्हाला आठवते ते त्यांचे न्यूजपेपरचे 2 रुपये वाचवणे, त्यांचा मराठी/ब्राह्मण द्वेष, त्यांचे मठ्ठ आणि उथळ विचार, थंडीत आमचे पांघरूण ओढून घेणे, आमचे हैंगर तोड़णे, रात्री जागणे, सकाळी बाथरूमला नंबर लावण्यावरुन भांडण, चहाचे 2.5 रुपये वाचवणे ई.ई.

पांडुरंगासारखे आमचे घरचेही आम्हाला फार समजून घेत असत... ते आम्हाला म्हणत... तुझेच नखरे फार आहेत..तुला सगळे आपल्या मनासारखे पाहिजे...थोड़े एडजस्ट करायला शिकावे.. बायको म्हणायची सगळे वाईट लोक तुलाच बरे भेटतात??
औरंगाबादचे मित्र म्हणायचे असे काय प्रेशर आहे तुला? सतत का रडतो? आम्ही जसंकाही जॉब करतच नाही...
ऑफिस मध्ये बॉस म्हणायचा you should enjoy life..

अरे शाटा एन्जॉय करणार?? उदाहरणार्थ ज्याची रात्रीची झोप आणि सकाळची जाग दुसर्याच्या मुड़वर अवलंबून आहे आणि तुम्ही म्हणता enjoy..
रविवारी 20-25 कपडे धुण्याचि काळजी असतांना तुम्ही शनिवारी रात्री दीड वाजता Hard Rock Cafe ला नेऊन रॉक म्युझिक ऐक म्हणणांर..आणि फुकट दारु पाजतो म्हणून उपकारही दाखवणार....पार्टी नको पण उपदेश आवर ही वेळ... वर आम्हीच फ्रस्ट्रेशन की दूकान... हा हा

आपण वर्षभरात पुण्यात अभ्यासाव्यतिरिक्त काय शिकलो हे पांडुरंग सांगवीकरला आपल्या बापाला सांगणे जसे जड़ गेले असेल तसेच सेल्स जॉब 'By choice' करून गाठीशी आलेले असंख्य अनुभव आणि शहाणपण व्यवहारिक जगात काय उपयोगाचे हा प्रश्न बराच काळ आम्हाला सतावत होता.. कारण व्यवहारिक जगात तेच मठ्ठ लोक 'यशस्वी' हा किताब मिरवत असतात..

गेल्या वर्ष-दीड वर्षात फेसबुकवर राजेश मंडलिकांसारखी माणसे भेटली आणि एक लक्षात आले.. आपण विक्षिप्त असलो तरी वाया गेलेलो नाही.. मुख्य म्हणजे ज्यांच्याकडून काही शिकावे अशी माणसे आयुष्यात आली ती फ़क्त या फेसबुकामुळे..

आम्हाला पुस्तकांपेक्षा माणसे वाचण्याची आवड असल्याने यापुढे कितीही माणसे/पुस्तके वाचनात आली तरी हा मोठा भाऊ पांडुरंग सांगवीकर सदैव स्मरणात राहील...

आनंद मोरे - तुझे विशेष आभार... _/\_

चिऊताईचे घरटे.. :)

फायनली....आमच्या गॅलरी मधल्या चिऊताईच्या रेड़ीमेड घरटयात काल एक गोड कपल राहायला आले आहे.

आम्ही गेले 7-8 महीने ते रिकामे घरटे पाहुन आशा सोडली होती...पण काल एक रुबाबदार चिमणा खुप वेळ तिकडे घुटमळत होता..पक्षांमधली Feasibility / Market Study करत असावा...
आम्ही त्या लाकड़ी घरटयात आधीच धान्याचे दाणे टाकून ठेवले होते..तो बऱ्याच वेळेस आत जाऊन बाहेर आला..ते होल इतर कोणत्याही पक्षाला आत येऊ देणार नाही ही खात्री पटल्यावर मग आपल्या गोड बायकोला (चिऊताई) घेऊन आला.. आम्ही हे दार न उघड़ता पडद्याआड़ पाहत होतो..

आज सकाळी परत त्यांची चिवचिव ऐकू आली..
बायकोने गो अहेड दिला आणि बँकेकडून लोन सैंक्शन झाले की हा इकडे शिफ्ट होणार.. मग they will plan their family... हा हा

पण आमचा दूसरा बेबी (काऊ) मात्र यांच्या घरट्याजवळ गेला की मी त्याला हाकलुन दिले..अंडे पळवतो म्हणून... त्या कावळ्याने काल खुप अविश्वासाने माझ्याकडे पाहिले...
रोज आपले फ़क्त लाड करणारे आणि आपल्यासाठी त्या हलकट कबूतराला हाकलणारे बाबा आज मला का रागावले?? असे जणू त्याने रुसुन विचारले...

माझ्या जन्मानंतर असे माझ्या दादाला कितिदा वाटले असेल असा विचार डोक्यात आला..

रादर सगळ्याच मोठ्या दादा आणि ताईला लहान भाऊ/बहिण झाल्यावर असे नक्कीच वाटत असेल..
की आपले आईबाबा आता आपले लाड करत नाहीत... 

एक रिक्शावाला.. :)

काही लोक आपल्या कामावर प्रचंड प्रेम करतात आणि त्यांच्या सहवासात आलेला प्रत्येक क्षण यादगार करून जातात..

आज सकाळी मुसळधार पावसात भेटलेला रिक्शावाला असाच सुंदर माणूस होता.. त्याच्या रिक्षात उदबत्तीचा मंद सुवास होता..पावसापासून बचाव करणारे पडदे सुद्धा त्याने खुप विचारपूर्वक निवडले आहेत असे त्यांच्या डिझाइन वरुन कळत होते..मागे एक चांगल्या क्वालिटीचा डेक होता ज्यावर मंद आवाजात गाणी चालु होती..
गाण्यांच्या सिलेक्शनवरुन माणूस कसा आहे याचा अंदाज बांधता येतो..धांगड़धिंग्यावाले गाणे ज्यांना आवडतात ते लोक म्हणूनच आम्हाला आवडत नाहीत..

रिक्षात पहला नशा गाणे..बाहेर मुसळधार पाऊस..उदबत्तीचा सुवास..जोडीला बायको... हा 15 मिनिटाचा घरापासून स्टेशनपर्यंतचा प्रवास कसा संपला कळलेच नाही...

कालच्या पावसात भिजलेल्या रवीना टंडनच्या आठवणी जाग्या असतांना आजचाही दिवस असा सुरु व्हावा..गतजन्माची पुण्याई...बाकी काय..

आपल्यालाही पाऊस आवडू शकतो हे दीड वर्षाआधी कोणी म्हणाले असते तर खरे वाटले नसते...

जानव्याचा विद्रोह..

"आमटी, आंबट वरण आणि जानव्याचा विद्रोह.." स्वैर विचार....

आमटी आणि आंबट वरणाची सानेसरांची पोस्ट वाचली आणि विचार आला की सगळ्या जातीतले लोक आम्ही "हे असलो तरी अगदीच तसे (टिपिकल) नाही" असे इतरांना सांगत असतात..
आम्ही चित्पावन असलो तरी तितके कंजुष नाही..आम्ही मराठा असलो तरी ब्रिगेड़ी नाही..आम्ही रिझरवेशन वाले असलो तरी "ढ" नाही.. मारवाड़ी/जैन/बामन असलो तरी तितके हरामी नाही...अशी वाकये आतापर्यंत शेकडो वेळेस ऐकली आहेत...

लहानपणी आमच्या 'सवयींकडे आणि भाषेकडे' पाहुन आमचे जूनियर कॉलेज मधले ब्राह्मणेतर मित्र म्हणायचे की "****द तू बामन वाटत नाही रे मायला" तर आम्हाला तो एक सन्मान वाटायचा... हा हा हा
या सगळ्याच्या मुळाशी आपण वेगळे / बेटर आहोत किंवा आपण त्यातून पुढे आलो आहोत हे जगापुढे ठसवण्याचा प्रयत्न असतो असे दिसते..

पण असे असले तरी खासगीत बहुतांश लोक जातीयवादीच असतात हेही तितकेच खरे..मग शहर असो की छोटे गाव..तीव्रता कमी जास्त होईल पण जात राहतेच..
आदर्श घ्यावा असे शुर लोक 'आमच्यात' दिसत नाहीत त्यामुळे इकडे कव्हर फ़ोटो साठी थेट पुराण काळातुन परशुराम महाराज आणावे लागले.. हा आमच्यातला जातीयवाद..

विचाराने दलित आणि जातीने ब्राह्मण अशी देवाने आमची कुचंबणा केल्यामुळे आम्हाला डोंबिवली फ़ास्ट मधला माधव आपटे आणि कोसला मधला पांडुरंग सांगवीकर तितकेच आपले वाटतात...नगरच्या नितिन आगे किंवा फँड्री मधल्या जब्याची आठवण आली की संताप आणि अश्रु गर्दी करतात ते याचमुळे..

बाळासाहेब नावाचे वादळ येण्याआधी आम्ही हिन्दू आहोत हे सांगण्यात एक प्रकारची अपराधी भावना लोकांच्या मनात होती असे म्हणतात..
तशीच मी ब्राह्मण आहे हे सांगण्यात एक अपराधी भावना आमच्याही मनात होती..ती अशात पुसट होत आहे..
कशीही असली तरी आपली जात म्हणून तिचा आदर आम्ही हल्ली करू लागलो आहोत..

आणि आयुष्यात कधी आत्मचरित्र लिहिलेच तर त्याचे नावसुद्धा ठरवले आहे...

"जानव्याचा विद्रोह" !!

Confession..

काल TV सीरियल मधल्या कलाकारांनी दूसरे काही काम बघावे पण लोकांचे तळतळाट घेऊ नये अशा आशयाची पोस्ट टाकली आणि नंतर स्वतःचाच राग आल्यामुळे डिलीट केली..

आपले पोट आरामात भरले की लोकांना भरभरुन ज्ञान वाटणाऱ्या दांभिक व्हाइट कॉलर लोकांचा मी नेहमीच द्वेष केला आहे..काल आपणही त्याच वर्तुळात जातोय असे वाटून प्रचंड अपराधी वाटले आणि पोस्ट उडवली..
मुळात सीरियल्सशी संबंधित लोकांनासुद्धा याची कल्पना असेलच, की जे ते लिहितात किंवा बोलतात ते तितकेसे चांगले नाही..पण आपले घर चालवण्यासाठी आणि मिळालेले वलय मेंटेन करण्यासाठी त्यांना हे काम करावे लागत असेल.. त्यांनासुद्धा या दिखाव्याचा आणि खोटेपणाचा राग नक्की येत असेल.. खुप बेटर लिहिण्याची आपली कूवत असतांना हे रट्टाळ कार्यक्रम लिहून त्यांना काय समाधान (Work satisfaction) मिळत असेल??

मनाविरुद्ध काम करतांना माणूस रोज कणाकणाने जळतो..संतापाचा उद्रेक झाला तरी तो महिन्याकाठी येणाऱ्या पगारासाठी हे सहन करतो आणि वरवर हसत दिवस काढतो.. आपल्या लायकीचे काम करायला मिळावे म्हणून त्याची जी तड़फड होते ती बराच काळ अनुभवून सुद्धा काल जो शहाजोगपणा आमच्या हातून झाला तो नेहमी लक्षात राहिल...

बाकी सीरियल्स च्या दर्जाबद्दल.. तो काय आहे हे जगाला माहीत आहे.. त्याबद्दल काय करता येईल ते आम्हाला माहीत नाही.. पण TV चे रिमोट हातात असतांना त्यांना "दूसरे काम बघा" यासारखा नीच सल्ला मात्र आम्ही कधीच देणार नाही...

टिप : आमची चूक मान्य आहेच...पण काही मठ्ठ लोक "Yes you are a चुतिया" "I already told u..Use your remote" असे म्हणायला सज्ज व्हायच्या आधीच सांगतो... "शांत रहा...आणि जमिनीवर रहा..."
आम्ही चूक मान्य केली म्हणजे तुम्हाला चढ़ायचे लायसंस मिळाले नाही...
नाहीतर आमची AIB स्टाइल भाषा आहेच.. हा हा हा

छाबड़ा सर.. ___/\___

दुसरा पर्याय नाही म्हणून शिक्षक होणारे आसपास अनेक लोक दिसतात..पण आमचे जसमीतसिंग छाबड़ा सर JBIMS सारख्या मोठ्या कॉलेजमधल्या MBA नंतर वार्षिक 10 लाख पेक्षा जास्त पगार सोडून 2003 साली औरंगाबाद सारख्या छोट्या ठिकाणी IMS मध्ये शिकवायला आले..त्याकाळी CAT बद्दल आणि ओवरऑल मैनेजमेंट बद्दल लोकांमध्ये कमी अवेयरनेस होता..

माझा ख़ास मित्र पराग त्यांचा विद्यार्थी होता..त्याच्यामुळे सरांशी ओळख झाली..आणि मी त्यांचा विद्यार्थी नसुनही ह्या माणसाने खऱ्या अर्थाने Mentor म्हणून भक्कम आधार दिला..

MBA करायचे म्हणजे खर्चिक काम होते..मुळात परीक्षा आणि GDPIला जाणे हेसुद्धा मला अवघड होते.. वेलिंगकर्स, सिम्बायोसिसचे SIMC, दिल्लीचे आणि जोधपुरचे एक असे काही नामांकित कोलेजचे कॉल लेटर्स आले होते..पण जाण्यायेण्याचा खर्च अधिक GDPI साठी वेगळा DD हा खर्च असल्याने मी ते टाळत होतो..सरांना हे मित्राने सांगितले आणि त्यांनी मला तड़क बोलावून घेतले..

माझ्यासमोरच जयपुरच्या मित्राला मोबाइलवर फोन केला आणि माझी राहण्याची सोय केली..जाण्या-येण्याचे तिकीट मी काढतो आणि वरखर्च मी देतो पण तू ही संधी घालवू नको असे म्हणाले..

मी अर्थातच यातले काहीच केले नाही..पुढे महाराष्ट्र CET परिक्षेने ऐन वेळी घात करून गाडी उताराला लागली ती अगदी 2014 पर्यंत..

पण या माणसाने मागेपुढे न बघता जो आधार दिला त्यासाठी आजही भरून येते..फीस भरली की आपला संबंध संपला असे वागणारे **श तांबट सारखे बनिया कुठे आणि हे कुठे..

फ़क्त लढ म्हणा सर..बाकी काही नको... :=

फेसबुकवरची गुरुपौर्णिमा.. __/\__

आपले 'बाय डिफ़ॉल्ट' जे सर्कल असते त्यात आपण फारसा बदल करू शकत नाही..काळानुसार आणि कामानुसार होणारा अपरिहार्य बदल वेगळा पण Conscious effort घेऊन सर्कल बदलणे किंवा त्यात भर घालणे आपल्याला शक्य झाले ते फ़क्त फेसबुक मुळे..

वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसे इकडे सुखाने नांदतात..कोणाची लिहिण्याची पद्धत आपल्याला आवडते तर कोणाची फोटोग्राफी..कोणी जगभर भटकंती करून येणारे विविध अनुभव शब्दबद्ध करतात तर कोणी आपल्या छोट्याशा जगात खोल सुर मारून सूक्ष्म निरिक्षण नोंदवतात..

कोणी एखाद्या कवितेचा भावार्थ सांगते तर कोणी आपल्या सिंपल आयुष्याबद्दल सांगून काही मोठा मेसेज देऊन जाते.. काही लोक बेधड़कपणे व्यक्त होतात तर काही फ़क्त वाचकाच्या रोल मध्ये असतात..
काही लोकांच्या वैचारिक पोस्ट म्हणजे हजारो अनुभव आणि पुस्तके याचे सार असते जे आपल्याला विनामूल्य उपलब्ध असते..

कोणी काही म्हणा.. गुरुशिष्य परंपरा फारशी मानत नसलो तरी इकडे अनेक अनुकरणीय लोक भेटले आणि आमचे कट्टयावरचे आयुष्य अजुन सुंदर झाले असे आम्हाला वाटते..

त्यांचे हे कॉन्ट्रिब्यूशन मान्य करतांना कोणतीच अंधभक्ती नाही किंवा हे सगळे खरच असे असतील का? हा प्रश्न विचारायची इच्छा सुद्धा नाही...कोणाला टॅग करून या व्हर्चुअल जगात ‪#‎हंगामा‬ करायचा नाही..कारण ते जे आहेत त्यांना माहीत आहे की ही पोस्ट त्यांच्यासाठी आहे.. 

ते जसे इकडे समोर येतात तसेच प्रत्यक्ष आयुष्यातही आहेत असे गृहीत धरून त्यांना कालच्या गुरुपौर्णिमेनिमित्त सादर प्रणाम.. __/\__

Movie Review : Drishyam

University of Ajay Devgn.. New Chapter : Drishyam

अजय देवगण या माणसाकडून आपण काय-काय शिकु शकतो याची मोठ्ठी लिस्ट बनवता येईल...'भला माणूस नेहमीच कमजोर नसतो' हा धड़ा कालच्या दृश्यम सिनेमा मधुन आम्ही घेतला..
आजुबाजुला घडणाऱ्या गोष्टींचे आणि माणसांचे सूक्ष्म निरिक्षण आणि योग्य तिथे Recall/Reproduce करण्याची क्षमता या जोरावर एक चौथी पास माणूस यशस्वी आणि समाधानी आयुष्य जगतो. आलेल्या संकटाला तोे धैर्याने सामोरे जातो आणि आपल्या परिवाराला त्यातून कसे बाहेर काढतो हे पडद्यावर पाहणे अतिशय प्रेरणादायक आहे..

"तू सिनेमा फार सीरियसली पाहतो, आजुबाजूच्या लोकांवर फुकट विचार करतो, सगळे समजत असूनही कधीकधी अंधभक्तासारखे वागतो" या सबबींखाली आमची टिंगल करणार्यांना आमचे कड़क उत्तर म्हणजे हा सिनेमा आणि त्याचा नायक विजय साळगावकर... अर्थात अजय देवगण a.k.a. मालिक भाई... आमचे दैवत.. ____/\____

Logically विचार केल्यास कथानकामधले कच्चे धागे सहज नजरेस पडतात...पण एकदा आपलं माणूस म्हटलं की आपण जसे त्याच्या इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करतो तसेच त्या गोष्टी या सिनेमात क्षुल्लक ठरतात..
आपल्यावर दोन प्रकारचे संस्कार होत असावेत असे आम्हाला वाटते.. एक घरात होणारे आणि दूसरे समाजात होणारे..घरातले संस्कार विचारांचा पाया असले तरी त्यावर कळस मात्र सामाजिक संस्कारांमुळेच उभारता येतो..

प्रेम म्हणजे फ़क्त मिळवणे नव्हे हा संकार रुजवणारा वनराज, घारीसारखा शांत, फोकस्ड पण चित्त्याहून चपळ व्हिजनरी मालिक भाई, देशभक्त भगतसिंग, अपहरण मधला रास्ता चुकलेला तरुण, गंगाजल मधला जबाबदार आणि कर्तव्यनिष्ठ पोलिस अधिकारी, राजनीति मधला मैत्रीला आणि खाल्लेल्या मिठाला जागणारा करण.. हे सर्व कैरक्टर्स आमच्यासाठी मार्गदर्शक आहेत...रादर आमची प्रेरणा आहेत..

 या सगळ्यांसमोर मालिक भाईंना हजारो गोलमाल आणि हिंमतवाला माफ़ आहेत..ओम शांती ओम सारखे सिनेमे हिट असणाऱ्या या देशात असे कॉम्प्रमाइज प्रत्येकाला करावे लागतेच..

 मालिक भाई... तुम्हाला परत एकदा साष्टांग ____/\____ आणि लहानपणीची क्रश तब्बूला गोग्गोड पापा...

Tuesday, 11 August 2015

Lady Luck and Burner..

Lady Luck and Burner.. स्वैर विचार

आज एका पोस्ट वर कमेंट करतांना 'लेडी लक' या आवडत्या विषयाबद्दल बोलावे वाटले.. प्रत्येक माणसाला आयुष्यात यशस्वी व्हायला याची गरज पड़तेच असे आमचे ठाम मत (श्रद्धा) आहे..
एखाद्या स्पर्धा परिक्षेसाठी लाखो लोक झगड़तात..त्यातले हौशेनवशे सोडल्यास 10% लोक पूर्ण झोकुन देऊन प्रयत्न करत असतात..बऱ्याचदा सगळ्यांचा IQ जवळपास सारखा असतो कारण ते स्क्रीनिंग मधून आलेले असतात..
 

अशा वेळेस EQ वगळता अशी काय गोष्ट असेल ज्याने ते एकतर जिंकतात किंवा हरतात..काही हरलेले परत लढायला तयार होतात आणि काही दुसरा मार्ग निवडतात..
आम्हाला वाटते त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या 'लेडी'वर हे ठरत असावे..त्या स्त्रीच्या अगदी हृदयाच्या आतून यांच्यासाठी प्रार्थना असेल तर ती देवही नाकारत नाही..
मैनेजमेंटच्या भाषेत attitude हा फरक सांगता येईल but attitude itself is one of the most misinterpreted word...

शिष्ट मूली दाखवतात तोही attitude असतो आणि हर्षा भोगले सारख्यांचा साधेपणा सुद्धा attitude असतो..
आतापर्यंत भेटलेल्या लोकांकडे पाहुन एक निष्कर्ष आम्ही काढला आहे..ज्यांचा स्ट्रगल आतून असतो (पाण्याविना फड़फडणाऱ्या माशासारखा) आणि ज्यांना अशा समर्पित स्त्रीची साथ असते त्यांना यश मिळायला फारसा उशीर होत नाही..

या रूल नुसार आपल्याकडे काय कमी आहे हे लगेच लक्षात येऊ शकते आणि जे नाही ते मिळवण्यासाठी प्रयत्न करता येतो..
अर्थात अशी समर्पित स्त्री आजच्या 'सेल्फ़ी ऍडिक्ट' जमान्यात मिळणे हे कापसाच्या ढिगार्यात सुई शोधण्यासारखे अवघड आहे..
मला मिळाली आहे.. तुम्हाला शुभेच्छा 

 टिप : पाण्यावाचून तड़फड याला मैनेजमेंट मध्ये Burner under your ass असेही म्हणतात.. जनरली ते फ़क्त सेल्सवाल्या लोकांच्या 'खाली' असते.. हा हा हा